शहरं
Join us  
Trending Stories
1
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
2
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
3
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
4
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
5
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
6
₹८०००० कोटींची फोडणी, मुकेश अंबानींच्या कंपनीला २ दिवसांत मोठं नुकसान; का झालं असं?
7
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?
8
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
9
Navratri Puja Vidhi 2024 :घटस्थापना आणि घट उत्थापन याचा शास्त्रोक्त विधी जाणून घ्या!
10
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
11
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
13
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
14
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
15
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
17
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
18
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
19
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
20
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश

किडणी देत मातेने दिला मुलाला पुनर्जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:03 AM

कोरोना महामारी व निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी कुटुंबाची अवस्था अतिशय बिकट झालेली. त्यातच राजू पुंजाजी पाडसवान (३३, रा. पिंपरखेडा, कन्नड) ...

कोरोना महामारी व निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी कुटुंबाची अवस्था अतिशय बिकट झालेली. त्यातच राजू पुंजाजी पाडसवान (३३, रा. पिंपरखेडा, कन्नड) याच्या दोन्ही किडणी निकामी झाल्या. तो डिसेंबरपासून डायलिसीसवर जीवन जगत होता. किडणीचा शोध घेतला, परंतु किडणी काही मिळत नव्हती. मुलाची अशी अवस्था मातेला पाहवत नव्हती. म्हणून आई यमुनाबाई (५३) यांनी स्वत:ची किडणी मुलाला देण्याचा व त्याचा जीव वाचविण्याची निर्णय घेतला. तिची किडणी जुळली आणि मुलावर शुक्रवारी औरंगाबाद शहरातील खासगी दवाखाना (सिग्मा) येथे यशस्वी शस्त्रक्रिया झाली.

लॉकडाऊन काळात आर्थिक संकटाने लॉक झालेल्या कुटुंबाला बाहेर दुसऱ्याला पैेसे देणे शक्य नव्हते. जेमतेम खर्चात शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने अखेर ‘आईने दाखविलेल्या हिमतीने कुटुंबाच्या जिवात जीव आला. गेली सहा महिने राजू डायलिसीसवर जगत होता. मातेने स्वत:ची किडणी देऊन त्याच्या पंखात बळ भरले आहे. मातेच्या या त्यागामुळे मुलाला पुनर्जन्म मिळाल्याने समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

(फोटो)