शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
2
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
3
Irani Cup 2024 : ३ बळी! मुकेश कुमारनं मुंबईच्या फलंदाजीला सुरुंग लावला; रहाणे-अय्यरवर मोठी जबाबदारी
4
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
5
"फडणवीसांपासून इतर सगळे नेते कूचकामी म्हणून...", संजय राऊतांचे अमित शाहांवर टीकेचे बाण
6
Nepal Floods : हाहाकार! नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे विध्वंस; मृतांची संख्या २१७ वर, १४३ जण जखमी
7
...तर 'बिग बॉस मराठी' होस्ट करताना दिसले असते शिवाजी साटम, म्हणाले- "मला महेशने..."
8
सर्वपित्री अमावास्या: ५ गोष्टी आवर्जून करा, पूर्वज वर्षभर राहतील प्रसन्न, देतील शुभाशीर्वाद!
9
Tata Steel News: टाटा स्टीलनं 'हा' प्रकल्प केला बंद, हजारो लोकांची नोकरी जाणार का?
10
नायर हॉस्पिटल-कॉलेजमधील विद्यार्थिनींची मनसेकडे धाव; लैंगिक छळाचा धक्कादायक आरोप
11
"सीनियर्सने ४८ तास उभं केलं, मैत्रिणीने अचानक..."; डॉक्टरच्या मृत्यूनंतर बहिणीचे गंभीर आरोप
12
IND vs BAN : अश्विननंतर पिक्चरमध्ये आला जड्डू; टीम इंडिया जोमात; बांगलादेश कोमात!
13
रवीना टंडनच्या विरोधात कोर्टाचे चौकशीचे आदेश, अभिनेत्रीवर धमकावल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
14
Chirag Paswan : "...तर मी एका मिनिटात मंत्रिपदाचा राजीनामा देईन"; चिराग पासवान यांचं मोठं विधान
15
अजित पवारांच्या पक्षाला मिळणार नवं चिन्ह?; सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी
16
UPI Payment : फोनमध्ये इंटरनेट नाहीये? टेन्शन कसलं! पाहा विना इंटरनेट कसं करू शकता UPI Payment
17
चतुर्ग्रही योगात नवरात्रारंभ: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, बँक बॅलन्स वाढ; प्रमोशन संधी, लाभच लाभ!
18
Navratri 2024: नवरात्र नऊ दिवसच का? घटस्थापना का करतात? नवरात्रीची उपासना कोणती? वाचा!
19
तनुश्री दत्ता गेल्या सहा वर्षांपासून आहे बेरोजगार; म्हणाली, "Me Too मधील आरोपींनीच..."
20
स्वत: पाकिस्तानी, बायको बांगलादेशी; 'हिंदू' आडनाव लावून गेली १० वर्ष भारतात वास्तव्य

मनपा आयुक्त, आता दलालरूपी रोगावर सर्जरी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 11:28 PM

मनपा आयुक्त म्हणून डॉ. निपुण विनायक हे जेव्हा शहारात आले, तेव्हा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून औरंगाबादकर त्यांना ओळखत होते. शहरात धडाडीने ते कामे करतील आणि औरंगाबादचा विकास होईल, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती; परंतु मनपात येणाऱ्या दलालांवर कारवाई करण्याऐवजी ते रडगाणे गात आहेत. कारवाईपासून दूर पळत आहेत. ही औरंगाबादसाठी चांगली गोष्ट नसल्याची चिंता सर्वसामान्यांबरोबर विविध क्षेत्रांतील व्यक्तींकडून व्यक्त होत आहे. डॉक्टर असलेल्या मनपा आयुक्तांनी किमान आतातरी महापालिकेत वाढलेल्या दलालरूपी रोगावर सर्जरी करावी, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देकर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख जपावी : महापालिकेतील दलालीसंदर्भात विविध क्षेत्रांतील व्यक्तींमध्ये चिंता

औरंगाबाद : मनपा आयुक्त म्हणून डॉ. निपुण विनायक हे जेव्हा शहारात आले, तेव्हा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून औरंगाबादकर त्यांना ओळखत होते. शहरात धडाडीने ते कामे करतील आणि औरंगाबादचा विकास होईल, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती; परंतु मनपात येणाऱ्या दलालांवर कारवाई करण्याऐवजी ते रडगाणे गात आहेत. कारवाईपासून दूर पळत आहेत. ही औरंगाबादसाठी चांगली गोष्ट नसल्याची चिंता सर्वसामान्यांबरोबर विविध क्षेत्रांतील व्यक्तींकडून व्यक्त होत आहे. डॉक्टर असलेल्या मनपा आयुक्तांनी किमान आतातरी महापालिकेत वाढलेल्या दलालरूपी रोगावर सर्जरी करावी, अशी मागणी होत आहे.महापालिकेतील अनेक कामे दलालांशिवाय होत नसल्याची प्रचीती नागरिकांना येते. त्यासंदर्भात अधिकाºयांना कल्पना असूनही काही कारवाई होत नसल्याचे मनपा आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यातून समोर आले. मनपात समस्या घेऊन सर्वसामान्य नागरिक कमी येतात. दलालांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मी मुख्यालयात सहसा बसत नाही, असे मनपा आयुक्त म्हणतात; परंतु त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलत नाहीत. त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का, हे त्यांनी जनतेला सांगावे. जनता नक्कीच त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे मत विविध क्षेत्रांतील जाणकारांनी व्यक्त केले.लोकाभिमुखता वाढवावीदलालांची संख्या वाढली, हे मनपा आयुक्तांनी सांगितले; परंतु हे औरंगाबादकरांना नवीन नाही. केवळ त्यांच्या तोंडून आल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे लोकाभिख कारभाराचा अभाव आहे. जनप्रतिनिधी आणि लोक यांच्यातही अंतर निर्माण झाले आहे, असा त्याचा अर्थ होता. त्यामुळे अधिक लोकाभिमुखता वाढविणे, लोकांची कामे नियमानुसार व्हावीत, यासाठी मनपा आयुक्तांनी प्रयत्न केले पाहिजे. कोणत्याही अडथळ्याशिवाय नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.- अ‍ॅड. प्रदीप देशमुखकारभारावर लक्ष द्यावेमनपा प्रशासन आणि पदाधिकाºयांनी लक्ष घातले तर अशाप्रकारचे वातावरण निर्माण होणार नाही. त्यासाठी त्यांनी हातात हात घालून काम करणे गरजेचे आहे. प्रशासन व पदाधिकाºयांनी मनपाच्या कारभारावर व्यवस्थित लक्ष दिले तर दलालांना प्रवेशच मिळणार नाही. पूर्णवेळ कार्यालयात बसावे. त्यांनी कोणाचीही भीती बाळगू नये. पोलिसांत तक्रार करावी. जनता त्यांच्या पाठीशी राहील.- प्रमोद खैरनार, राज्य उपाध्यक्ष, के्रडाईराजीनामा द्यावाएखाद्या कामगाराने काम केले नाही तर वेतन दिले जात नाही. आयुक्त कामाच्या जागेवर बसत नसतील, तर त्यांचेही वेतन करता कामा नये. दलाली बंद करण्यासाठीच त्यांची नेमणूक केली आहे. ते होत नसेल तर राजीनामा दिला पाहिजे.- अ‍ॅड. अभय टाकसाळ, जिल्हा सहसचिव, भारतीय कम्युनिस्ट पक्षपारदर्शी यंत्रणा करावीमनपा आयुक्तांनी दलालांना नियंत्रित केले पाहिजे. हे त्यांच्या नियंत्रणाबाहेर आहे, अशी कोणतीही परिस्थिती नाही. नागरिकांचा त्रास कमी होईल, असा उद्देश ठेवून कामे केली पाहिजेत. नागरिकांची मनपातील कामे सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीने होतील, अशी पारदर्शी यंत्रणा केली पाहिजे.- सुनील देशपांडे, माजी अध्यक्ष, आर्किटेक्ट असोसिएशनकठोर कारवाई करावीमनपात दलाल असतील तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपा आयुक्त आहेत. दलालांनी येऊ नये, यासाठी मनपा आयुक्तांनी खुर्चीवर बसले पाहिजे. दलाल येत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. त्यांच्यासह मोठ्या अधिकाºयांनी सर्वसामान्य जनतेसाठी किमान रोज दोन तास दिले पाहिजे.-प्रा. भारती भांडेकर, अध्यक्ष, जागृती मंचशहरासाठी योग्य नव्हेमनपा आयुक्त जे बोलले ते खरे आहे की खोटे हे त्यांनाच माहीत आहे; परंतु खड्डेमय रस्ते, जागोजागी पडलेला कचरा ही परिस्थिती पाहता महापालिकेकडून कोणतेही काम होत नसल्याचा प्रत्यय नागरिकांना येत आहे. तसाच प्रत्यय उद्योजकांना येत आहे. कोणतेही कार्यालय असो तेथे दलाल असतील तर औरंगाबादसाठी चांगली गोष्ट नाही.- मनीष अग्रवाल, जनपसंर्क अधिकारी, मसिआ

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाCorruptionभ्रष्टाचार