शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महापालिका निवडणूक : संपूर्ण रचना बदलून सातारा-देवळाईत होणार पाच वॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 18:22 IST

महापालिकेला नव्याने सर्व ११५ वॉर्ड तयार करावे लागणार असल्याने सर्वांची हद्द आणि रचना बदलणार हे निश्चित.

ठळक मुद्देशहरातील तीन वॉर्ड कमी होणारइच्छुक कार्यकर्त्यांमध्ये चिंता

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग पद्धतीला स्थगिती दिली. त्यामुळे एप्रिल २०२० मध्ये होणाऱ्या मनपाच्या निवडणुका जुन्या वॉर्ड पद्धतीनेच होणार आहेत. वॉर्ड पद्धतीत शहरातील ११५ वॉर्डांमधील ३ वॉर्ड गायब होणार आहेत. ते वॉर्ड कोणते हे अद्याप निश्चित नाही. सातारा-देवळाई भागात नव्याने तीन वॉर्ड तयार होतील. या भागात एकूण पाच वॉर्ड ठेवण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. महापालिकेला नव्याने सर्व ११५ वॉर्ड तयार करावे लागणार असल्याने सर्वांची हद्द आणि रचना बदलणार हे निश्चित.

राज्य निवडणूक आयोगाने १८ डिसेंबर रोजी प्रभाग रचनेच्या सोडतीला स्थगिती दिली. त्यामुळे आता निवडणूक वॉर्ड रचनेप्रमाणेच होणार हे जवळपास निश्चित आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून अद्याप यासंदर्भात अंतिम मार्गदर्शन आलेले नाही. दोन ते तीन दिवसांमध्ये यासंदर्भात आयोगाकडून सविस्तर पत्र प्राप्त होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाने वॉर्ड रचनेप्रमाणे निवडणूक घ्यायची ठरल्यास त्यादृष्टीने कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, यादृष्टीने जवळपास तयारी पूर्ण केली आहे. 

महापालिकेला ११५ पेक्षा अधिक वॉर्ड तयार करता येणार नाही. सातारा-देवळाईचा परिसर २०१५ मध्ये मनपात समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे या भागात दोन वॉर्ड तयार करून निवडणूक घेण्यात आली होती. २५ हजार मतदारांचा एक वॉर्ड या भागात आहे. वॉर्ड रचनेनुसार महापालिकेच्या निवडणूक विभागात सर्व वॉर्डांची रचना आता दहा हजार मतदारांच्या अनुषंगाने तयार करावी लागेल. सध्या काही वॉर्डांमध्ये ७ हजार, तर काही ठिकाणी १२ हजार मतदार आहेत.

 प्रत्येक वॉर्डात एक हजार मतांचा एक ब्लॉक तयार करण्यात येतो. जास्त मतदार असलेल्या वॉर्डातील ब्लॉक काढून शेजारच्या वॉर्डात जिथे कमी मतदार आहेत, तेथे टाकावे लागतील. या प्रक्रियेत वॉर्डांची रचना पूर्णपणे बदलणार आहे. कोणत्या दिशेने ही प्रक्रिया सुरू करावी, कशा पद्धतीने करावी यासंदर्भातील मार्गदर्शन राज्य निवडणूक आयोग करणार आहे.

गायब होणारे तीन वॉर्ड कोणते?नवीन वॉर्ड रचनेनुसार तीन वॉर्ड कमी होणार आहेत. आता हे तीन वॉर्ड कोणते असतील यावर आता महापालिकेत खल सुरू झाला आहे. विद्यमान ११५ पैकी तीन वॉर्डांचे नावच गायब होणार आहे. त्यामुळे त्या वॉर्डातील विद्यमान नगरसेवकांना आसपासच्या वॉर्डांमध्ये घुसखोरी करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

तीन नवीन वॉर्ड जन्माला येतीलसातारा-देवळाईत सध्या दोनच वॉर्ड आहेत. या भागातील लोकसंख्या लक्षात घेऊन मनपा प्रशासन तेथे पाच वॉर्ड तयार करणार आहे. त्यामुळे या भागातील इच्छुकांना नवीन वॉर्डांमध्ये निवडणूक लढवावी लागणार आहे. इच्छुकांनी आतापासूनच तयारीही सुरूकेली आहे. मात्र वॉर्ड कसा राहील हे त्यांनाही माहीत नाही.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूकSatara areaसातारा परिसरAurangabadऔरंगाबाद