शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’; औरंगाबादेत आजपासून प्रत्येक घरात जाऊन आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 14:06 IST

जिल्ह्यातील ९ लाख कुटुंबांची होणार पाहणी

ठळक मुद्दे मुख्यमंत्र्यांनी घेतला तयारीचा आढावामहापालिकेची ३४५ पथके तयार 

औरंगाबाद : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत मंगळवारपासून शहरातील प्रत्येक घरी जाऊन महापालिकेचे कर्मचारी नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करणार आहेत. कोविडची  कोणतीही लक्षणे दिसल्यास संबंधिताला त्वरित उपचार देण्यात येणार आहेत. या कामासाठी महापालिकेने ३४५ पथके नेमली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळी या मोहिमेचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंंगद्वारे प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला. 

मोहीम कालावधीत गृहभेटी देण्यासाठी आरोग्य पथके तयार करणे, ताप, खोकला, दम लागणे अशी कोविडसदृश लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना जवळच्या फीवर क्लिनिकमध्ये पाठविणे, घरातील सर्व सदस्यांना  प्री कोविड, कोविड आणि पोस्ट कोविड परिस्थितीनुसार आरोग्य संदेश समजावून सांगणे यासारख्या गाईडलाईन्स शासनाने मोहिमेदरम्यान राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

जिल्ह्यातील ९ लाख कुटुंबांची होणार पाहणीकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळावे, यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न सुरू आहेत. त्याअनुषंगानेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील ९ लाख कुटुंबांची पाहणी यात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. १५ सप्टेंबरपासून ही मोहीम सुरू होणार असून, यामध्ये घरोघरी जाऊन आरोग्याबाबतीत पाहणी केली जाईल.  पाहणीत दोन कर्मचाऱ्यांचे व स्वयंसेवकांचे एक पथक असेल. हे पथक एका दिवसात ५०  घरांना भेटी देईल. त्यामध्ये घरातील लोकांना काय आजार आहेत, याची माहिती गोळा केली जाणार आहे. कुटुंबांतील सदस्याला ताप तसेच छातीचे काही आजार आहेत का याची माहिती संकलित केली जाणार आहे. १५ सप्टेंबर ते १० आॅक्टोबरदरम्यान पहिला तर १२ ते २४ आॅक्टोबर काळात दुसऱ्या टप्प्यातील मोहीम राबविण्यात येईल.

होम आयसोलेशनबाबत अहवालाची मागणी कोरोनाची रुग्णसंख्या पाहता होम आयसोलेशनच्या सूचना मुख्य सचिवांनी दिल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी चव्हाण यांनी अधिष्ठाता, मनपा आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबतच्या धोरणासंदर्भात दोन दिवसांत अहवाल देण्याची सूचना दिली आहे. सध्या २५ हॉस्पिटल्सच्या माध्यमातून होम आयसोलेशनमध्ये उपचार केले जातात. १ हजार ७० रुग्णांवर सध्या उपचार करण्यात येत आहेत. अहवाल आल्यानंतर बैठक होईल, त्यानंतर पुढील निर्णय होईल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद