शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

बौद्धिक सुपिकतेसाठी धम्म परिषदांची आवश्यकता

By admin | Published: January 15, 2017 11:25 PM

लोहारा : रविवारी बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

लोहारा : पडीक जमीन सुपीक करण्यासाठी जशी मशागतीची गरज असते तशीच बौद्धिक सुपिकता येण्यासाठी धम्म परिषदांची नितांत आवश्यकता आहे. गावा-गावात बुद्धविहार स्थापन करून श्रामणेर शिबीर, धम्म जागृती होणे गरजेचे असून, यासाठी स्वत:तील दोष नष्ट करून सत्य अनुभवण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे, असे प्रतिपादन भन्ते उपगुप्त महाथेरो (पूर्णा) यांनी केले़शहरातील लोहारा हायस्कूल प्रांगणात रविवारी बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भिक्खु नागसेन महाथेरो (सोलापूर), नागसेन बोधी ( उदगीर), आर्या धम्मचारीणी, सुमेध नागसेन आदी उपस्थित होते. भन्ते उपगुप्त महाथेरो म्हणाले की, द्वेश, मोह, राग, भय, लोभ हे आश्रव नाहिसे करून माणूस बनण्याचा प्रयत्न तथागत बुद्धांनी केला. सत्य जाणा, प्रेमाने वागा, द्वेष करू नका, कोणाच्या ही भूलथापाना भुलू नका, असेही ते म्हणाले़यावेळी प्रा. राहूल कदम यांचा भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम झाला. याप्रसंगी जिल्हा बॅकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप भालेराव, नगरसेविका जयश्रीताई वाघमारे, दत्ता गायकवाड, अभियंता डी. एन. सुर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. धम्मपरिषद यशस्वी करण्यासाठी प्रा. सुधाकर गायकवाड, विष्णू वाघमारे, जयश्रीताई कांबळे, जीवन गायकवाड, गजेंद्र डावरे, दिगंबर कांबळे, अरविंद गायकवाड, प्रविण कांबळे, जयश्री मस्के, स्वप्निल सुर्यवंशी, राम कांबळे, दिलीप मसुरे, ऋषीकेश कांबळे आदींनी परिश्रम घेतले़ नितीन वाघमारे यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले. दरम्यान, शहरातून सकाळी भव्य धम्मरॅली काढण्यात आली. या रॅलीत बौध्द उपासक, उपासिका सहभागी झाल्या होत्या़