शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'पाणीपुरवठा योजनेची चौकशी हवी, मग भरा पैसे'; औरंगाबाद जिल्हा परिषदेची अजब मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 15:05 IST

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत राबविण्यात आलेल्या विविध पाणीपुरवठा योजनांमध्ये गैरव्यवहार झाला असून, संबंधित यंत्रणेकडून जवळपास २५ कोटी रुपयांची वसुली करण्यात यावी, असा मुद्दा लेखापरीक्षण अहवालात नमूद करण्यात आला.

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत राबविण्यात आलेल्या विविध पाणीपुरवठा योजनांमध्ये गैरव्यवहार झाला असून, संबंधित यंत्रणेकडून जवळपास २५ कोटी रुपयांची वसुली करण्यात यावी, असा मुद्दा लेखापरीक्षण अहवालात नमूद करण्यात आला. त्यानुसार जि. प. सदस्य एल. जी. गायकवाड यांनी रीतसर पत्र देऊन १० योजनांची चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान, चौकशीसाठी ८ लाख ५० हजार रुपये खर्च अपेक्षित असून, तो भरण्यात यावा, असे पत्र पाणीपुरवठा विभागाने सदस्य गायकवाड यांच्या हातावर ठेवताच ‘आ बैल मुझे मार’ या उक्तीप्रमाणे त्यांची अवस्था झाली. 

विकास निधी वितरित करताना भौगोलिक क्षेत्रांचा समतोल साधण्यात यावा, टँकर घोटाळा, कुपोषित बालकांची वाढती संख्या, जि. प. मालमत्तांवरील अतिक्रमणे, या व अन्य मुद्यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी त्यांच्या दालनात आज गुरुवारी भाजप सदस्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी जिल्हा परिषदेतील भाजप गटनेते शिवाजी पाथ्रीकर, एल. जी. गायकवाड, रामदास परूडकर, रेखा नांदूरकर, उषा हिवाळे हे भाजपचे ५ जि. प. सदस्य, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, सिंचन विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता राठोड, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद राजूस्कर आदींची उपस्थिती होती. 

सदस्य एल. जी. गायकवाड यांनी पाणीपुरवठा योजनांमधील गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला. जिल्ह्यातील किमान १० योजनांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे पाणीपुरवठा विभागाकडे केली होती. योजनांंचे अंदाजपत्रक कधी मंजूर झाले, योजना कधी सुरू झाली. त्या कामांच्या मोजमाप पुस्तिका कुठे आहेत, या मुद्यांची चौकशी व्हावी, अशी अपेक्षा गायकवाड यांनी पत्राद्वारे केली होती. मात्र, चौकशीसाठी प्रतियोजनानिहाय किमान ८ ते १० हजार खर्च अपेक्षित असून, १० योजनांच्या चौकशीसाठी ८ लाख ५० हजार रुपये भरावे लागतील, या आशयाचे पत्र गायकवाड यांना पाणीपुरवठा विभागाने दिल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांना सांगितले. तेव्हा गुणवत्ता नियंत्रकांकडून या गैरव्यवहाराची चौकशी केली जाईल, असे आश्वासन कौर यांनी दिले. 

यापुढे निधी वाटपामध्ये भेदभाव किंवा भौगोलिक असमतोल होणार नाही, याची दखल घेतली जाईल. यासाठी विषय समित्यांना मार्गदर्शक सूचनाही केल्या जातील, असे आश्वासनही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भाजप सदस्यांना दिले. यापूर्वी झालेल्या चुका भविष्यात होणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाईल, असेही पवनीत कौर म्हणाल्या.

अचानक भेटी देऊन टँकर्सची चौकशी कराजिल्ह्यात पाणीपुरवठ्यासाठी सुरू असलेल्या टँकरवर कोणाचेही नियंत्रण नाही, याकडे सदस्य गायकवाड, पाथ्रीकर व रामदास परूडकर या सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. पाणीपुरवठ्यासाठी १२ हजार लिटर पाणी क्षमतेच्या टँकर्सना आदेश दिलेले असताना प्रत्यक्षात १० हजार लिटर क्षमतेच्या टँकरद्वारे खेपा केल्या जातात. यासाठी अचानक काही गावांना भेटी देऊन टँकरचे लॉगबुक तपासण्याचा निर्णय या बैठकीत झाला.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदCorruptionभ्रष्टाचारfundsनिधी