शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

२०२१ पैकी सुमारे २२५ मतदान केंद्रांवर बोटावर मोजण्याइतके झाले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 18:50 IST

शिवसेनेला १६, एमआयएमला १०, तर अपक्षाला ११ केंद्रांवर शून्य मतदान

ठळक मुद्देशिवसेनेच्या पारंपरिक मतांना खिंडार काँग्रेसला अनेक केंद्रांवर ५० च्या आत-बाहेर मतदान झाले

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीसाठी सहा विधानसभा क्षेत्र मिळून असलेल्या २०२१ मतदान केंद्रांपैकी सुमारे २२५ केंद्रांवर सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना बोटावर मोजण्याइतके मतदान झाले आहे. शिवसेनेला १६ केंद्रांवर शून्य मतदान झाले आहे. एमआयएमला १० केंद्रांवर, तर अपक्ष उमेदवाराला ११ केंद्रांवर शून्य मतदान झाले आहे. काँग्रेसला अनेक केंद्रांवर ५० च्या आत-बाहेर मतदान झाले आहे. 

मुस्लिम आणि दलित भागातून शिवसेनेला १, २, ७, ५ अशी मते मिळाली आहेत. २०२१ पैकी अंदाजे २ हजार बुथवर शिवसेनेला मतदान झाले आहे. एमआयएमला देखील १० ते १५ मतदान केंद्रे सोडली तर जवळपास सर्व केंद्रांवर खाते उघडता आले. अपक्ष उमेदवारालादेखील १० केंद्रे वगळता सर्वत्र कमी-अधिक मते मिळाली आहेत. काँग्रेसला सर्व केंद्रांवर मतदान मिळाले आहे. एक-दोन वगळता कोणत्याही केंद्रावर काँग्रेसला शून्य मते मिळालेली नाहीत. 

गंगापूर मतदारसंघातून १० केंद्रांवर शिवसेनेला बोटावर मोजण्याइतके मतदान झाले. पश्चिम मतदारसंघात ६ ते ७ केंद्रांवर, तर मध्य मतदारसंघात ५ केंद्रांवर शून्य मतदान मिळाले आहे. २१ केंद्रांवर १ ते ७ मतांदरम्यान मते सेना उमेदवाराला मिळाली आहेत. पूर्व मतदारसंघातील ३५ केंद्रांवर सर्व मिळून १०५ मते सेना उमेदवाराला मिळाली आहेत. तशी परिस्थिती अपक्ष उमेदवाराची आहे. हिंदूबहुल भागांमध्ये एमआयएमच्या उमेदवाराला मतदान झाले आहे. वैजापूरमध्ये एमआयएमला १२ केंद्रांवर कमी मतदान झाले आहे.  कन्नड मतदारसंघात एमआयएमला १८ बुथवर कमी मतदान आहे. 

शिवसेनेच्या पारंपरिक मतांना खिंडार २० वर्षांपासून शिवसेनेकडे मतदारसंघ असल्यामुळे सर्व मतदान केंद्रांवरून कमी-अधिक मतदान होणे स्वाभाविक आहे; परंतु एमआयएम आणि अपक्ष उमेदवाराला प्रचाराला आणि स्वत:ला मतदारांसमोर जाण्यास कमी वेळ मिळाला तरी त्यांना जवळपास सर्व केंद्रांवर मतदान झाले. अपक्ष उमेदवाराला अपक्षेपेक्षा जास्त मते मिळाल्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात शिवसेनेच्या पारंपरिक मतांना खिंडार पडल्याचे मतदान केंद्रनिहाय आकडेवारीवरून दिसते. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल