शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
3
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
4
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
5
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
6
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
7
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
8
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
9
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
10
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
11
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
12
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
13
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
14
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
16
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
17
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
18
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
19
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
20
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका

'ना अपक्ष, ना कोणाला पाठिंबा'; औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतून विनोद पाटील यांची माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 17:59 IST

मराठा आरक्षण याचिकाकर्ता विनोद पाटील यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण याचिकाकर्ता विनोद पाटील यांनी औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे आज जाहीर केले. आज दुपारी समर्थकांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केली. तसेच निवडणुकीत कोणत्याही उमेदवारास पाठिंबा देणार नसून तटस्थ राहणार असल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणूक जाहीर होताच विनोद पाटील यांनी औरंगाबाद लोकसभेतून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. महायुतीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. मात्र, भाजप आणि शिंदेसेनात औरंगाबादची जागा प्रतिष्ठेचा मुद्दा झाला. अखेर शिंदेसेनेला जागा सुटून महायुतीकडून पालकमंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतरही विनोद पाटील निवडणूक लढणार यावर ठाम होते. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी नागपूर येथे जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी देखील त्यांनी निवडणूक लढणारच याचा पुनरुच्चार केला होता. त्याच दिवशी अचानक संदीपान भूमरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

दरम्यान, मी छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवावी अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. मी निवडणूक लढवली पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले, पण शहरातील सत्ताधारी दोन आमदार आणि एक खासदाराने मला उमेदवारी देऊ नयेत, यासाठी टोकाचा विरोध केला, असा आरोप विनोद पाटील यांनी केला. तसेच उदय सामंत यांनी देखील भेटू घेऊन, तुम्ही आता थांबा, अशी विनंती केली. विजयाचे गणित माझ्याकडे असल्याचे सांगिताच सामंत यांनी ते माझ्या हातात नाही असे म्हंटले. त्यानंतर आज समर्थकांची बैठक घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर लोकसभा लढवली पाहिजे असा आग्रह शहरवासीयांनी धरला होता. त्यामुळे निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती, असेही पाटील म्हणाले.

अपक्ष निवडणूक लढली तरी विजय...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून महायुतीकडून निवडणूक लढवण्यास सांगितले. कालही मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत माझं बोलणं झालं. मागील दोन तीन दिवसांत मी नागरिकांशी चर्चा केली. मी अपक्ष निवडणूक लढवल्यास मी निवडून येऊ शकतो, पण निवडून आलो नाही तर कुणाला तरी पाडण्यासाठी उभा होता हा डाग मला लावून घ्यायचा नाही. मी कुणाला फायदा व्हावा यासाठी माघार घेत नाही. उद्यापासून लोकांची भेट घेणार आहे. त्यांचे प्रश्न सोडवणार आहे. मी नाक रगडून लोकांची माफी मागतो, मी सार्थ ठरलो नाही, असेही ते म्हणाले.  ज्यांची घर काचेची असतात त्यांनी लोकांच्या घरावर दगड मारू नयेत, असा इशाराही त्यांनी दिला. 

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४