शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

जायकवाडी धरणावरील तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधातील याचिका ‘एनजीटी’ने फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 20:24 IST

सदर प्रकल्पाच्या विरोधात कहार समाज पंच समितीने पर्यावरणहित याचिका (ईआयएल) दाखल केली होती.

छत्रपती संभाजीनगर : पक्षी अभयारण्य आणि ‘इको-सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून घोषित केलेल्या जायकवाडी धरणावरील तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधातील याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे न्यायिक सदस्य न्या. दिनेशकुमार सिंह आणि तज्ज्ञ सदस्य विजय कुलकर्णी यांनी फेटाळली.

अशा प्रकारचा प्रकल्प पर्यावरणीय संवेदनशील भागात नसावा याविषयी काही कायदेशीर तरतूद आहेत काय याविषयीचे पुरावे याचिकाकर्त्यांना सादर करता आले नाहीत, म्हणून न्यायाधिकरणाने याचिका फेटाळली. सदर प्रकल्पाच्या विरोधात कहार समाज पंच समितीने पर्यावरणहित याचिका (ईआयएल) दाखल केली होती.

टिहरी हायड्रो कंपनी ही राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या (एनटीपीसी) मालकीची आहे. महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने जायकवाडी धरणावर तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या स्थापनेसाठी निविदा जारी केली आहे. तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प जलचरांसाठी हानिकारक ठरेल आणि संरक्षित पक्षी अभयारण्यातील जैवविविधतेला कायमचे नुकसान पोहोचेल, अशी माहिती यापूर्वी याचिकाकर्त्याच्या वतीने सादर करण्यात आली होती. धरणातील पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी पुरवले जाते. सौर पॅनेलने झाकल्याने पाणी दूषित होईल, असा मुद्दाही मांडण्यात आला होता. या याचिकेवर ९ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वनसंरक्षक मत्स्यव्यवसाय मंत्रालय यांनी न्यायालयाच्या पूर्वीच्या आदेशानुसार अहवाल सादर केला. संरक्षित अभयारण्यात प्रकल्प उभारण्यास परवानगी असल्याचे त्यांनी नमूद केले. तर केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, पर्यावरण आणि वन विभागाने संबंधित कायद्याची प्रत सादर केली.

ही प्रमोटेड ॲक्टिव्हिटीही ‘प्रमोटेड ॲक्टिव्हीटी’ असून बायोगॅस, सौर ऊर्जा निर्मितीचा त्यात समावेश असल्याचे सांगितले. याचिकाकर्त्याच्या वतीने पुन्हा पर्यावरणीय मुद्दे मांडण्यात आले. तसेच पर्यावरण मंत्रालयाचे लेखी उत्तर नसल्यामुळे हा एनजीटीचा अवमान असल्याचे त्यांनी म्हटले. अभयारण्यात तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पास प्रतिबंध असल्याची कायदेशीर तरतूद आहे का, अशी विचारणा न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या वकिलांना केली. असा कोणताही कायदा नसल्याचे त्यांनी सांगितले. सुनावणीअंती न्यायाधिकरणाने याचिका फेटाळली.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणelectricityवीजCourtन्यायालयAurangabadऔरंगाबाद