शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

जिल्हा बँक अध्यक्षपदी नितीन पाटील बिनविरोध; दादांबद्दल सहानुभूती व नानांच्या मुत्सद्देगिरीचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 18:11 IST

अध्यक्षपदावरून निवडणूक होऊ शकली असती. पण ती टाळण्यात यश मिळाले.

ठळक मुद्देसंचालक मंडळाची मुदत मे २०२० पर्यंततोपर्यंत नितीन पाटील यांना अध्यक्ष करण्याचा निर्णय

- स. सो. खंडाळकर

औरंगाबाद : दिवंगत सुरेशदादा पाटील यांच्याबद्दलच्या सहानुभूतीचा व महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मुत्सद्देगिरीचा विजय म्हणजे नितीन पाटील यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी झालेली बिनविरोध निवड होय. खरं तर, ‘नाना तुम्हीच अध्यक्ष व्हा’ असा बहुतांश संचालकांचा सूर होता. पण नानांना तर अध्यक्ष व्हायचं नव्हतं. ते स्वाभाविकही होतं. आधीच महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची मोठी व महत्त्वाची जबाबदारी...त्यात औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्षपदही त्यांच्याचकडे आणि आता तोंडावर आलेल्या विधानसभेच्या निवडणुका. फुलंब्री मतदारसंघातून लढायची सुरू असलेली तयारी... या  पार्श्वभूमीवर बागडे यांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपद स्वीकारणे अशक्यच होते. 

गुरूवारी सकाळी अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सुरू होण्याआधी बँकेचे सर्व संचालक एकत्र जमले. त्यावेळी नाना तुम्हीच अध्यक्ष व्हा, असा संचालकांचा सूर होता. नानांना मोठी पसंती होती; पण नानांनी सांगितलं, मी अध्यक्ष होणार नाही. पण मी सांगतो, त्या उमेदवाराला पाठिंबा द्या. नानांच्या मनात नितीन पाटील यांनाच अध्यक्ष करायचं होतं. सुरेशदादा पाटील यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीही नितीन पाटील यांना अध्यक्षपद दिलं जावं, असा सहानुभूतीचा सूर निघाला होता. 

नितीन पाटील बिनविरोधसुरेश पाटील यांच्याबद्दलची सहानुभूती, वर्षानुवर्षे त्यांच्यासमवेत काम करण्याची मिळालेली संधी, त्यांचा काटकसरी स्वभाव, त्यांनी वेळोवेळी केलेली मदत यातून उतराई होण्याची हीच संधी असल्याची भावना अनेक संचालकांना झाली होती. काही संचालकांनी नितीन पाटील नको असा सूर काढला. हे संचालक सुरेशदादांच्या विरोधातही भूमिका घेतच होते. ते पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांच्या पाठीमागे एकवटले. पण हरिभाऊ बागडे यांनी त्यांनाही समजावून सांगितले आणि संभाव्य निवडणूकही टाळली व नितीन पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून घेतले. 

बॅँकेचा दर्जा टिकविण्याचे आव्हाननंतर पत्रकारांशी बोलताना बागडेनाना म्हणाले, बँकेचा अध्यक्ष कोण होणार याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता होती. या पदासाठी इच्छुकही होते, नाही असं नाही. सुरेश पाटील यांनी बँकेचा कारभार चांगल्या प्रकारे सांभाळला होता. संचालक मंडळाची मुदत मे २०२० पर्यंत आहे. तोपर्यंत नितीन पाटील यांना अध्यक्ष करावे, असा संचालक मंडळाचा निर्णय झाला. बँकेचा ‘अ’ दर्जा टिकविणे, कर्ज वसुली वाढविणे, ही आव्हाने आहेत. बँक फार मोठ्या नफ्यात नाही. कर्जमाफीमुळे नफा कमी झाला. आता वसुली वाढवावी लागेल, असे मतही नानांनी यावेळी मांडले.

सर्वपक्षीय सोबत : दादांचा शिरस्ता पुढेहीसुरेशदादा पाटील हे संचालकांच्या निवडणुकीत सर्व जाती, धर्म व पक्षांचे प्रतिनिधी सोबत घेत असत. आताच्याही संचालक मंडळात मतदानास पात्र एकूण १९ संचालकांपैकी तीन भाजपचे, तीन शिवसेनेचे, तीन राष्टÑवादी काँग्रेसचे, एक शिवसंग्राम पक्षाचे व उर्वरित संचालक काँग्रेसचे, असे पक्षीय बलाबल आहे. स्वत: हरिभाऊ बागडे हे भाजपचे आहेत. पण त्यांनीही पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून सुरेशदादांप्रमाणेच सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा प्रयत्न केला. म्हणून नितीन पाटील यांचा बिनविरोध विजय शक्य झाला. अन्यथा आताही अध्यक्षपदावरून निवडणूक होऊ शकली असती. पण ती टाळण्यात यश मिळाले. हे महत्त्वाचे....! राजकीय व सहकारी क्षेत्राच्या दृष्टीने एक चांगला संदेश यातून गेला, एवढं मात्र खरं.

टॅग्स :bankबँकAurangabadऔरंगाबादHaribhau Bagadeहरिभाऊ बागडे