शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

वर्षभरापासून सानुग्रह अनुदानाचा नाही पत्ता !

By admin | Published: August 12, 2015 12:48 AM

उस्मानाबाद : विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर अथवा अपंगत्व आल्यास शासनाकडून संबंधितांच्या कुटुंबियास सानुग्रह अनुदान दिले जाते.

उस्मानाबाद : विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर अथवा अपंगत्व आल्यास शासनाकडून संबंधितांच्या कुटुंबियास सानुग्रह अनुदान दिले जाते. मात्र मागील वर्षभरापासून मागणीच्या प्रमाणात अनुदान उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे जवळपास ४८ प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यातच दोन दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत आणखीन १३ प्रस्ताव मंजूर झाल्याने प्रस्तावांची संख्या आता ६१ वर जावून ठेपली आहे. राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार रुपये दिले जातात. कायमचे अपंगत्व आल्यास ५० हजार तर एक अवयव निकामी झाल्यास ३० हजार रुपये देण्यात येतात. या योजनेला जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. योजनेसाठी येणाऱ्या प्रस्तावांची जिल्हास्तरीय कमिटीकडून छाननी झाल्यानंतर ते अनुदानासाठी पात्र ठरतात. फेब्रुवारी २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीत झालेल्या बैठका दरम्यान जवळपास ५२ प्रस्ताव दाखल झाले होते. यापैकी अवघ्या चार जणांनाच अनुदान वितरीत करण्यात आले आहे. तुटपुंजा स्वरुपात अनुदान प्राप्त होत असल्याने इतर लाभार्थ्यांना या रक्कमा एकेक वर्ष झाले तरी मिळत नसल्याचे समोर आले आहे. आजही ४८ प्रस्ताव प्रलंबित आहेत. यातील ८ ते १० प्रस्ताव हे मार्च २०१४ मध्ये मंजूर झालेले आहेत. एकेक वर्ष लोटले तरी अनुदान मिळत नसल्याने लाभार्थ्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.दरम्यान, मागील एक वर्षापासून मागणीच्या प्रमाणात अनुदान मिळत नसल्याने ४८ प्रस्ताव प्रलंबित आहेत. असे असतानाच दोन-तीन दिवसापूर्वी झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत आणखी १३ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता मंजूर प्रस्तावांची संख्या ६१ वर जावून ठेपली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शासनाकडे वेळोवेळी अनुदानाच्या रक्कमेची मागणी नोंदविली जात आहे. परंतु शासनाकडूनही केवळ आश्वासन मिळत आहे. त्याची पूर्तता होत नसल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सातत्याने अनुदानाची मागणी केली जात आहे. परंतु शासनाकडून मागणीच्या प्रमाणात अनुदानाची रक्कम उपलब्ध होत नाही. ३१ मार्च पूर्वी ३ लाख रुपये मिळाले होते. त्यानंतर एप्रिल महिन्यात ७५ हजार आणि मे महिन्यात ७५ हजार असे एकूण अवघे साडेचार लाख रुपये मिळाले आहेत. या माध्यमातून अवघ्या ६ लाभार्थ्यांना लाभ देता आला. शासनाने आखडता हात घेतल्याने ४८ लाभार्थ्यांना लाभापासून वंचित रहावे लागत आहे.