शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

ना कोणी मत मागायला येतो ना जाहीरनाम्यात उल्लेख; आम्ही तर मत ‘नोटा’ला देतो: सँडी गुरू

By प्रशांत तेलवाडकर | Updated: April 9, 2024 18:39 IST

जाहीरनाम्यातही ‘बिना झोली के फकीर’ दुर्लक्षितच

छत्रपती संभाजीनगर : तृतीयपंथी समोर दिसला की अनेकांच्या कपाळावर आठ्या पडतात... जिल्ह्यात ८ ते १० हजार तृतीयपंथी आहेत; पण केवळ १३२ जणांकडेच मतदार कार्ड आहे. कोणताही राजकीय पक्षाचा उमेदवार असो आमच्याकडे कोणी मत मागायला येत नाही. आम्ही मतदानाला जातो व ‘नोटा’चे बटण दाबून संविधानाने दिलेल्या अधिकाराचा हक्क बजावतो, असे मत तृतीयपंथी सँडी गुरू यांनी व्यक्त केले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजातील एक वर्ग तृतीयपंथीयांचे काय मत आहे, याविषयी सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या संचालिका, सॅण्डी गुरूशी संवाद साधला असता त्यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केले. देशाला स्वातंत्र्य मिळवून ७६ वर्षे झाली; पण अजूनही तृतीयपंथी समाज पारतंत्र्यातच जगत आहे, असा खेद व्यक्त करीत सॅण्डी गुरूंनी सांगितले की, आतापर्यंत निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यात तृतीयपंथीयांचा विचार केला गेला नाही.

तृतीयपंथीयांमध्ये जनजागृती नसल्याने मतदार कार्ड काढून घेण्यात मोठी उदासीनता आहे. मतदानात टक्केवारी वाढत नसल्याने राजकीय पक्षही तृतीयपंथीयांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

खरे धर्मनिरपेक्ष आम्हीचधर्मनिरपेक्ष तर तृतीयपंथीयच आहेत, असे सॅण्डी गुरूंनी अभिमानाने सांगितले, देशात कोणी धर्मनिरपेक्ष, जातीभेद न मानणारा असेल तर फक्त तृतीयपंथीयच आहे. आम्ही कोणाला धर्म विचारत नाही, जात विचारत नाही की पंथ... तरी आम्ही सर्व तृतीयपंथीय गुण्यागोविंदाने नांदतो... जो आम्हाला भीक देईल, तोच आमच्यासाठी परमेश्वर असतो.

२००५ पासून मतदानसॅण्डी गुरूंनी सांगितले की, २००५ मध्ये महापालिकेची निवडणूक झाली तेव्हापासून मतदान करीत आहे. पूर्वी आजोबा ज्या राजकीय पक्षाला मतदान करीत, त्याच पक्षाला मी मतदान करीत असे; पण नंतर योग्य उमेदवार वाटत नसल्याने मी ‘नोटा’लाच मतदान करीत असते.

कोणाला मतदान करावे ?सॅंडी गुरूंनी सांगितले की, खासदार जनतेचा सेवक असतो, तो राजा नसतो. स्वत:ला राजा समजणाऱ्याला मतदान करू नका. तळागाळातील लोकांपर्यंत ज्यांचा संपर्क आहे, जो सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होऊ शकतो, जो जातिभेद, वर्णभेद, लिंगभेद मानत नाही, अशा उमेदवाराला मतदान करावे. मतदान करताना डोळे उघडे ठेवून बटण दाबावे, असे आवाहन सॅण्डी गुरूंनी केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Votingमतदान