शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
2
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
3
"मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
4
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
5
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
6
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
7
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
8
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
10
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
11
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
12
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
13
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
14
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ
15
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
16
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
17
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
18
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
19
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
20
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

पीक विमा नव्हे, ही तर प्रधानमंत्री कॉर्पोरेट कंपन्या कल्याण योजना - राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 12:31 AM

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : पीक विम्यापोटी ८०४१ कोटी रुपये विमा कंपन्यांना भरण्यात आले. प्रत्यक्षात ७०० कोटी रुपयांचे विम्याचे ...

ठळक मुद्देआत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी शेतकरी सन्मान अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पीक विम्यापोटी ८०४१ कोटी रुपये विमा कंपन्यांना भरण्यात आले. प्रत्यक्षात ७०० कोटी रुपयांचे विम्याचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले. या विम्याचा फायदा शेतकºयांपेक्षा कॉर्पोरेट कंपन्यांना अधिक झाला. ही प्रधानमंत्री पीक विमा योजना नसून ती ‘प्रधानमंत्री कॉर्पोरेट कंपन्या कल्याण योजना’ झाली असल्याची खरमरीत टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी येथे केली.संघटनेच्या वतीने १ मेपासून ‘शेतकरी सन्मान अभियान’ राबविले जात आहे. ‘आता मरणार नाही...तर लढणार’ असा नारा देत शेतकºयांमध्ये जीवनाविषयी सकारात्मक भावना याद्वारे निर्माण करण्यात येत आहे. या अभियानाच्या निमित्ताने खा. शेट्टी शुक्रवारी शहरात आले होते. पत्रपरिषदेत त्यांनी सांगितले की, मागील वर्षी ४२ हजार कोटी रुपयांचे शेतकºयांना कर्जवाटप करण्यात आले होते. यंदा मात्र २२ हजार कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. याचा अर्थ शेतकरी सधन झाले असे नाही, तर बँका शेतकºयांना कर्ज देणे टाळत आहेत. यामुळे शेतकºयांनी सावकार, मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले. ते फेडता येत नसल्याने आत्महत्या वाढल्या आहेत. सरकारने अदानीला आफ्रिकेतून डाळी आयातीची परवानगी दिली. यामुळे देशात डाळीचे भाव घटले, हे सुद्धा आत्महत्या वाढण्याचे कारण असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला. एकीकडे एकानंतर एक येणारी नैसर्गिक आपत्ती व दुसरीकडे केंद्र व राज्य सरकारचे कृषीविषयक सुलतानी धोरण हेच आत्महत्या वाढीस कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले. देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होतात, हे आमचे अपयश आहे, अशी खंत खा. शेट्टी यांनी व्यक्त केली. यासाठी ९ मे पर्यंत ‘ शेतकरी सन्मान अभियान’ राबवीत असून, यात शेतकºयांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यात येत आहे. यासाठी शेतकºयांकडून फॉर्मही भरून घेण्यात येत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. यावेळी अखिल भारतीय किसान समन्वय संघर्ष समितीचे व्ही.एम. सिंग, जय किसान आंदोलनाचे अविक शहा यांची उपस्थिती होती.नोटाबंदी, जीएसटीचा सर्वाधिक फटका शेतकºयांनाखा. राजू शेट्टी म्हणाले की, शेतकºयांचे सर्व व्यवहार रोखीने होतात. यामुळे नोटाबंदीचा सर्वाधिक फटका शेतकºयांना बसला, तसेच इतर कंपन्यांनी लॉबिंग करून जीएसटीतील करप्रणालीत बदल करून घेतले.आपली उत्पादने त्यांनी कमी करप्रणालीत टाकली; पण शेतकºयांना अशी लॉबिंग करता आली नाही.कृषी क्षेत्रात लागणारी सर्व यंत्रे, साहित्य, खत, बियाणे यावरील जीएसटीत जास्त कर लावण्यात आल्याने त्याचा फटकाही शेतकºयांना बसल्याचा आरोपही त्यांनी केला.विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणीअखिल भारतीय किसान समन्वय संघर्ष समितीचे व्ही.एम. सिंग म्हणाले, शेतकºयांच्या प्रश्नासाठी संसदेचे विशेष अधिवेशन घेण्यात यावे, यासाठी देशातील सर्व शेतकरी संघटना व ३२ राजकीय पक्ष एकत्र आले आहेत.१० मे रोजी देशातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांत निवेदन देण्यात येणार आहे. याद्वारे केंद्र सरकारला विशेष अधिवेशन घेण्यास आम्ही भाग पाडू.या अधिवेशनात दोन विधेयक मांडण्यात येतील, यात १) शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी २) स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, याचा समावेश असणार आहे.

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाAurangabadऔरंगाबादRaju Shettyराजू शेट्टी