शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

अबब ! औरंगाबादेत एक लाखावर अनधिकृत नळ कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 01:20 IST

गळती आणि चोरीही मोठी : सर्वाधिक पाणीपट्टी भरणाऱ्या शहराला पुरवठा मात्र तोकडा; उपलब्ध असूनही पाच दिवसांआड मिळते पाणी

- ऋचिका पालोदकरऔरंगाबाद : राज्यात सर्वाधिक पाणीपट्टी भरणाºया औरंगाबादकरांना पाणी मात्र कमीच मिळते. शहरात अनधिकृत नळांची संख्या जवळपास एक लाखावर असून, पाण्याची गळती तब्बल १० दशलक्ष घनमीटर इतकी आहे. त्यामुळे पाणीपट्टीचे दर वाढविण्याआधी या दोन प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज जलतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.औरंगाबादमध्ये पाणीपट्टीचा दर वर्षाला ४०५० रुपये एवढा असून, तो पुणे- मुंबईपेक्षाही अधिक आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक पाणीपट्टी भरणारे शहर म्हणून औरंगाबाद ओळखले जाते. पाणीपट्टी एवढी जास्त असूनही राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत औरंगाबादचा पाणीपुरवठा मात्र अगदीच तोकडा आहे. औरंगाबाद शहराची लोकसंख्या १७ लाखांच्या घरात असून, दररोज शहराला २५० दशलक्ष घनमीटर एवढ्या पाण्याची आवश्यकता आहे. यापैकी जायकवाडी धरणातून शहराला १३० दशलक्ष घनमीटर पाणी मिळते. मुख्य पाईपलाईनला अनेक ठिकाणी असलेल्या गळतीमुळे १० दशलक्ष घनमीटर पाण्यावर औरंगाबादकरांना दररोज पाणी सोडावे लागते. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेला दरवर्षी अंदाजे ६० कोटी रुपये एवढा खर्च करावा लागतो. शहरातील अधिकृत नळांची कागदोपत्री संख्या १ लाख ३० हजार असली तरी शहरात १ लाखापेक्षा अधिक अनधिकृत नळ कनेक्शन आहेत, तसेच शहराची थकीत पाणीपट्टी ४०० कोटींच्या घरात आहे. पाच दिवसांआड पाणी मिळणारे आणि महाराष्ट्रात सर्वाधिक पाणीपट्टी भरणारे सर्वसामान्य औरंगाबादकर पाण्याची किंमत चांगलीच जाणतात. त्याचवेळी अवैध नळ कनेक्शन घेऊन खुलेआम पाणीचोरी करणारे आणि वरून दमदाटी करणाऱ्यांची संख्याही येथे कमी नाही. त्यामुळे पाणीपट्टी वाढविण्याआधी ही गळती आणि अवैध नळकनेक्शनवर अंकुश आणला जावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून केली जात आहे.आधी पाणीपुरवठा यंत्रणा प्रभावी करा : औरंगाबाद शहरातील ५० टक्के नळ कनेक्शन अनधिकृत आहेत. त्यामुळे अशा लोकांना आणि दमदाटी करून पाणी घेणाºयांना पाणीदरवाढ लागूच होत नाही. तुम्ही त्यांच्याकडून पाणीपट्टी वसूल करू शकत नाही, त्यांच्याविरुद्ध तुम्ही कायदा वापरत नाही. कोणी अधिकारी त्यांच्याविरुद्ध उभा राहिलाच, तर अन्य लोक त्यांना पाठिंबा देत नाहीत, लगेच त्या प्रकरणावर स्टे आणला जातो. मग पाणीदरवाढ करून उपयोग काय? मुळात पाणीपुरवठा करणारी आपल्या देशातील यंत्रणा प्रभावी नाही. पाण्याचे कोणतेही मोजमाप होत नाही. याची एक योग्य पद्धत जोपर्यंत लागू होत नाही, तोपर्यंत पाणीदरात वाढ करून उपयोग नाही. -डॉ. प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञलोकांमध्ये जागृती वाढणे गरजेचे : १० दशलक्ष घनमीटर पाणी दररोज वाया जाते, असे म्हणता येणार नाही. कारण हा ‘अझ्युम लॉस किंवा टेक्निकल लॉस’ म्हणून गृहीत धरण्यात येतो. जेवढी लांब पाईपलाईन असेल, तेवढा हा लॉस जास्त गृहीत धरतात. पाणीचोरी, अनधिकृत नळ कनेक्शन घेणाºयांवर आम्ही कायम कारवाई करीतच असतो. अनेकदा पोलीस ठाण्यातही तक्रारी दाखल करतो; पण जोपर्यंत यामध्ये लोकसहभाग असणार नाही, तोपर्यंत हे प्रकार असेच चालू राहतील. आपल्या बाजूचा माणूस जर अवैध पद्धतीने नळ घेत असेल, तर ही गोष्ट नगरसेवक, मनपा कर्मचाºयांपर्यंत कळविणे, हे सामान्य नागरिकांचे कर्तव्य आहे; पण या विरुद्ध कोणीही बोलत नाही. हा प्रश्न एकट्या प्रशासनाचा नसून सामाजिक प्रश्न आहे. - हेमंत क ोल्हे, कार्यकारी अभियंता, मनपाऔरंगाबाद शहराची लोकसंख्या 17,00,000थकीत पाणीपट्टी 400 कोटीअधिकृत नळांची कागदोपत्री संख्या 1,30,000पाण्याची शहराला आवश्यकता आहे. 250 दशलक्ष घ.मी.पाणी शहराला जायकवाडी धरणातून मिळते 130 दशलक्ष घ.मी.पाण्याची गळती 10 दशलक्ष घ.मी.