शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

आता रेल्वेप्रवास होणार वेगवान, मनमाड ते औरंगाबाद लोहमार्गाचे विद्युतीकरण अंतिम टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 15:17 IST

स्टेशनवर केबल टाकण्याचे काम सुरू : फेब्रुवारीपर्यंत जालन्यापर्यंत विद्युतीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य औरंगाबाद : मनमाड (अंकाई) ते परभणी लोहमार्गाच्या ...

स्टेशनवर केबल टाकण्याचे काम सुरू : फेब्रुवारीपर्यंत जालन्यापर्यंत विद्युतीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य

औरंगाबाद : मनमाड (अंकाई) ते परभणी लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम सुरू असून, ते जुलै २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मनमाड (अंकाई) ते औरंगाबाददरम्यान विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रेल्वेस्टेशनवर सध्या विद्युत खांबांवर केबल टाकण्याचे काम सुरू झाले असून, महिनाभरात हे काम पूर्ण होणार आहे. येत्या अडीत ते तीन महिन्यांत जालन्यापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मनमाड (अंकाई) ते परभणी रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम जुलै २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. डिसेंबरपर्यंत औरंगाबादपर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य दिले होते. त्यानुसार हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. औरंगाबादेत खांब (पोल) उभारण्यात आल्यानंतर विद्युत यंत्रणेचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झालेल्या मनमाड (अंकाई) ते रोटेगाव या मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे चालविण्याची चाचणी २६ मार्च रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या देखरेखीत यशस्वीरीत्या झाली आहे.

औरंगाबादहून लवकरच चाचणीविद्युतीकरणाचे काम पूर्ण होताच औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे चालविण्याची चाचणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विद्युतीकरण पूर्ण होत असल्याने रेल्वे रुळाच्या परिसरातील नागरिकांना, रेल्वे गेटमधून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबादAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशन