शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या माजी खासदाराच्या पुतण्याची मुंबईत आत्महत्या; सहाव्या मजल्यावरून मारली उडी
2
"मला फाशी दिली तरी चालेल पण..."; महायुतीविरोधात विधान, माजी आमदाराची भाजपाने केली हकालपट्टी
3
महायुती, महाविकास आघाडीची कोणत्या मतदारसंघामध्ये 'अग्निपरीक्षा'!; आकडे काय सांगतात? 
4
Womens T20 World Cup :२ वर्ल्ड चॅम्पियन्स तर पाटी कोरी असणाऱ्या २ संघांनी गाठली सेमी
5
मुंबईहून निघालेल्या कारमधील पाच कोटी लुटले, सातारा जिल्ह्यातील घटना
6
प्रियंका गांधी लढवणार निवडणूक; काँग्रेसने केली उमेदवारीची घोषणा
7
भाजपचा नेता-कार्यकर्ता महायुतीविरोधात बोलला तर कठोर कारवाई; प्रदेशाध्यक्षांचा थेट इशारा
8
Womens T20 World Cup : इंग्लंडला पराभवाचा धक्का; वेस्ट इंडिज महिला उपांत्य फेरीत
9
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
10
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
11
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
12
अंबानी कुटुंबाकडून रतन टाटांचे स्मरण; रिलायन्सच्या वार्षिक कार्यक्रमात टाटांना वाहिली श्रद्धांजली
13
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
14
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
15
'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार; तिची एकूण संपत्ती किती? वाचून व्हाल थक्क
16
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
17
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
18
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
19
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
20
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल

आता गेट आहेत; पण पाणीच नाही; जिल्ह्यातील ८० टक्के कोल्हापुरी बंधारे कोरडेठाक

By विजय सरवदे | Published: October 27, 2023 1:58 PM

जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाचे बंधाऱ्यांना गेट टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 

छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी साधारणपणे १५ ऑक्टोबरपासूनच कोल्हापुरी बंधाऱ्यांतील पाणी अडविण्यासाठी गेट टाकले जातात. मात्र, यंदा जिल्ह्यातील तब्बल ८० टक्के बंधारे कोरडेठाक आहेत. तथापि, परतीचा पाऊस झाल्यास त्या पाण्याचा रब्बी हंगामात सिंचनासाठी थोडासा का होईना फायदा होईल, या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाचे बंधाऱ्यांना गेट टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 

जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंमाम तर गेलाच, आता रब्बीचे काय होईल, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. अल्प पावासामुळे बहुतांशी कोल्हापुरी बंधारेही कोरडेच आहेत. वास्तविक, साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापासून गेट टाकून कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये वाहते पाणी अडवले जाते; पण यंदाची परिस्थिती बघता बंधाऱ्यांतच पाणी नाही, तर गेट टाकून फायदा काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये ५८५ कोल्हापुरी बंधारे हे पाणी अडविण्यासाठी उपयुक्त आहेत. मात्र, कधी अतिवृष्टीमध्ये गेट वाहून गेले, तर कधी अनेक बंधाऱ्यांचे गेट चोरीला गेले. त्यामुळे यापूर्वी अनेक वर्षे गेटअभावी बंधाऱ्यांतील पाणी वाहून जात असे. सद्य:स्थितीत ५८५ बंधाऱ्यांसाठी साधारणपणे १८ हजार गेटची गरज असून, सिंचन विभागाकडे सुमारे १५ हजार गेट उपलब्ध आहेत. उर्वरित २७०० नवीन गेट तयार करून ते बंधाऱ्यांना बसविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानुसार पुरवठादारांनी बंधाऱ्यांच्या ठिकाणी गेट उपलब्ध करून दिले आहेत. काही गेट टाकले; पण अनेक गेट टाकलेले नाहीत.

१५ ते २० टक्के बंधाऱ्यांत पाणीवरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदा सिल्लोड, सोयगाव तालुक्यांत बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे त्या परिसरातील बंधाऱ्यांमध्ये थोडेफार पाणी आहे. तेथील बंधाऱ्यांना गेट लावून पाणी अडविण्यात यश आले आहे; पण छत्रपती संभाजीनगर तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे या तालुक्यातील बंधारे कोरडेठाक आहेत. जिल्ह्यातील अवघ्या १५ ते २० टक्के बंधाऱ्यांमध्ये थोडेफार पाणी आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदAgriculture Sectorशेती क्षेत्रWaterपाणी