शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
5
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
6
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
7
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
8
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
9
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
10
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
11
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
12
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
13
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
14
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
15
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
16
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
17
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
18
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
19
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
20
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक

आता मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 11:35 PM

लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी निवडणूक विभागाने मतदानाच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे निश्चितच मतदानाचा टक्का वाढणार आहे. आयोगाने निवडणूक मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत केली आहे.

ठळक मुद्दे११ तास चालणार मतदान प्रक्रिया : उन्हामुळे मतदानाचा टक्का घसरू नये, यासाठी घेतला निर्णय

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी निवडणूक विभागाने मतदानाच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे निश्चितच मतदानाचा टक्का वाढणार आहे. आयोगाने निवडणूक मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत केली आहे. या वेळेत मतदान केंद्रांवर मतदारांना सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश श्रींगी यांनी सांगितले.मतदान प्रक्रियेसाठी पूर्वी सकाळी साडेसात ते सायंकाळी पाच दरम्यान मतदान घेण्यात येत होते. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदान होण्यासाठी आयोगाने वेळ बदलली आहे. उन्हामुळे दुपारच्या सत्रात मतदानाचा टक्का घसरतो. त्यामुळे सकाळी अर्धा तास आणि सायंकाळच्या टप्प्यात एक तास वाढविण्यात आला आहे.आयोगाने मतदानाच्या वेळात दीड तास वाढ केल्याने निश्चितच मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल. उन्हाचा पारा चढत असल्यामुळे मतदानाच्या वेळेत वाढ करण्यात आल्याचे दिसते. प्रशासन तांत्रिक कारणे सांगत असले तरी उन्हामुळे मतदान कमी होऊ नये, यासाठीच आयोगाने वेळ वाढविल्याचे स्पष्ट होते.१२२ मतदान केंद्रांचे स्थलांतरप्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी शेडस् करण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक उपचाराच्या सुविधेसह चार मतदान केंद्रांसाठी एक आरोग्य पथक तैनात असेल. जिल्ह्यात तीन हजारांच्या आसपास मतदान केंद्रे आहेत. १२२ ठिकाणच्या इमारती जीर्ण असल्यामुळे त्यांची कामे सुरू असल्याने ती इतरत्र स्थलांतरित करण्यात आल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रींगी यांनी सांगितले.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदान