शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

औरंगाबादहून रेल्वेंची संख्या वाढली, मुंबई मार्गावर सर्वाधिक गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 17:46 IST

Aurangabad Railway Station : सर्वप्रथम १ जून २०२० रोजी सचखंड एक्स्प्रेस सुरू झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्यांत अन्य रेल्वे सुरू करण्यात आल्या.

ठळक मुद्देऔरंगाबादहून २४ रेल्वेंची ये-जा  रेल्वेस्टेशन पुन्हा गजबजलेकोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच प्रवासावर भर

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : लाॅकडाऊनमुळे कधी नव्हे इतकी शांतता औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर ( Aurangabad Railway Station ) अनुभवास आली. मात्र, अनलाॅक होताच एक-एक रेल्वे सुरू होत गेली. आजघडीला औरंगाबादहून दररोज, साप्ताहिक, द्विसाप्ताहिक, आठवड्यातून तीन दिवस आणि पाच दिवस धावणाऱ्या अशा २४ रेल्वेंची ये-जा होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रवाशांची संख्याही वाढली असून, मुंबई मार्गावर सध्या सर्वाधिक गर्दी पाहायला मिळत आहे. ( The number of trains increased in Aurangabad) 

गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर लाॅकडाऊन लावण्यात आल्याने देशभरातील सर्व रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या. तब्बल दोन महिन्यांनंतर सर्वप्रथम १ जून २०२० रोजी सचखंड एक्स्प्रेस सुरू झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्यांत अन्य रेल्वे सुरू करण्यात आल्या. औरंगाबादमार्गे धावणाऱ्या २४ पैकी ११ रेल्वे या रोज धावतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रवाशांची संख्याही ( Railway Passenger ) वाढली आहे. त्यामुळे रेल्वे येण्याच्या वेळेत प्लॅटफाॅर्म पुन्हा एकदा प्रवाशांनी भरलेले पाहायला मिळत आहे. प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्रीही वाढली आहे.

या रेल्वेंना प्रवाशांची गर्दीऔरंगाबाद रेल्वेस्टेशनवर सध्या सर्वाधिक गर्दी ही मुंबईच्या रेल्वेंना होत आहे. तपोवन, नंदीग्राम, देवगिरी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. सचखंड एक्स्प्रेसलाही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची सध्या कोरोना चाचणी केली जाते.

रोज ३०० प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्रीकोरोना प्रादुर्भावामुळे काही कालावधीत प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री बंद करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री सुरू करण्यात आली असून, दररोज ३०० तिकिटांची विक्री होत असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष, सोशल डिस्टन्स अशक्यरेल्वे प्रवासात सोशल डिस्टन्स पाळणे प्रवाशांना अशक्य होत आहे. रेल्वे आल्यावर बोगीत चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रवाशांची एकच गर्दी होते. कोरोना प्रादुर्भावाची पर्वा न करता अनेक जण मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले.

तोंड धुण्यासाठी मास्क काढलापरभणीवरून औरंगाबादपर्यंतचा प्रवास रेल्वेने केला. रेल्वेतून उतरल्यानंतर तोंड धुण्यासाठी मास्क काढला. लगेच मास्क लावला.- विशाल भंडारे, प्रवासी

रेल्वे प्रवासात मास्क मिळावाघाईगडबडीत मास्क कुठेतरी पडला. प्रवासात मास्क मिळण्याची कुठेही सुविधा दिसून आली नाही. प्रवासात मास्क मिळाला पाहिजे.- एक प्रवासी

सध्या सुरू असलेल्या रेल्वे :- सचखंड एक्स्प्रेस- नंदीग्राम एक्स्प्रेस- देवगिरी एक्स्प्रेस- जनशताब्दी एक्स्प्रेस- तपोवन एक्स्प्रेस- अजंता एक्स्प्रेस- रेणीगुंठा एक्स्प्रेस- मराठवाडा एक्स्प्रेस-नांदेड-राेटेगाव डेमू- औरंगाबाद-हैदराबाद विशेष रेल्वे

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनMumbaiमुंबईRailway Passengerरेल्वे प्रवासी