शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

निरीक्षकांनी पाहिला अंत

By admin | Published: May 17, 2014 1:09 AM

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीचा निकाल जाहीर होण्यास प्रचंड विलंब झाला.

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीचा निकाल जाहीर होण्यास प्रचंड विलंब झाला. मराठवाड्यासह राज्यातील सर्वच मतदारसंघांचे निकाल दुपारपर्यंतच घोषित झाले. मात्र, औरंगाबादचा निकाल जाहीर होण्यास सायंकाळचे ७ वाजले. केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी दिलेल्या सूचनांमुळे हा निकाल लांबल्याचे अधिकार्‍यांनी खाजगीत बोलताना सांगितले. औरंगाबाद मतदारसंघाच्या मतमोजणीचा निकाल दुपारी १२ वाजेपर्यंत घोषित होईल, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला होता. मात्र, मतमोजणीची प्रक्रिया अतिशय संथ सुरू राहिली. त्यामुळे संपूर्ण मतमोजणीस तब्बल ११ तास लागले. सकाळी ८ वाजता सुरू झालेली मतमोजणी सायंकाळी ७ वाजता संपली. एकूण २१ फेर्‍या झाल्या. प्रत्येक फेरीसाठी १० मिनिटे लागतील, असा हिशेब करून चार ते साडेचार तासांत निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. प्रत्यक्ष सायंकाळचे ७ वाजले. त्यामुळे मोजणी कर्मचारी, उमेदवार, त्यांचे मोजणी प्रतिनिधी, पत्रकार, कार्यकर्ते, बंदोबस्तावरील पोलीस, अशा सगळ्यांची गैरसोय झाली. ११ तास थांबावे लागल्यामुळे सगळेच अक्षरश: कंटाळून गेले. दुपारी एकनंतरच बाहेर कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता दिसत होती. कडक ऊन आणि केंद्राबाहेरील अपुरी व्यवस्था, यामुळे उशीर होत होता, तसे कार्यकर्ते अस्वस्थ होत होते. अखेर सायंकाळी ७ वाजता निकाल जाहीर झाला. मराठवाड्यातील आणि राज्यातील इतर सर्व मतदारसंघांचे निकाल दुपारपर्यंतच जाहीर झाले होते. राज्यात सर्वात शेवटचा निकाल औरंगाबादचा ठरला. दरम्यान, केंद्रीय निवडणूक निरीक्षक शालिनी मिश्रा यांनी दिलेल्या सूचनांमुळेच प्रक्रिया लांबल्याचे अधिकार्‍यांनी खाजगीत सांगितले. मिश्रा यांनी पहिल्या फेरीची आकडेवारी घोषित केल्याशिवाय दुसर्‍या फेरीची मोजणी करायची नाही, अशा सूचना दिल्या. त्यामुळेच प्रत्येक फेरीनंतर पुढील फेरीची मोजणी सुरू होण्यास पाच सहा मिनिटांचा अवधी जात होता. परिणामी संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया संपण्यास सहा तासांचा अवधी लागला. निवडणूक निर्णय अधिकारी विक्रमकुमार यांना विचारले असता त्यांनी मात्र, वेगळेच कारण सांगितले. मतमोजणीसाठी आम्ही आकडेवारी नोंदविण्याकरिता कॉम्प्युटराईज व्यवस्थेबरोबरच मॅन्युअली (हाताने नोंद करणे) व्यवस्थाही केली होती.