शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

मुख्यमंत्र्यांसाठी दीड लाख राख्या रवाना; ‘उमेद’ महिला, कर्मचारी संघटनेचे लक्षवेधी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 12:55 IST

ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) हे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून चालविले जात आहे.

छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत (उमेद) कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रविवारी टेम्पोमध्ये दीड लाख राख्या पाठविण्यात आल्या आहेत. ‘उमेद’ महिला व कर्मचारी संघटनेने या माध्यमातून एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. 

ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) हे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून चालविले जात आहे. उमेद अभियानाने बचत गट, ग्रामसंघ, प्रभागसंघ बांधणीसाठी लक्षणीय काम केले आहे. बचत गटाच्या चळवळीला गती देऊन त्यांच्यात उद्योजकतेची आवड निर्माण केली आहे. त्यामुळे ‘उमेद’ अभियानास शासनाने नियमित विभाग म्हणून मान्यता द्यावी, या अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी, अधिकारी आणि समुदाय संसाधन व्यक्तींना सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, या मागणीसाठी ‘उमेद’ महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेने ८ जुलै रोजी आझाद मैदान येथे आंदोलन केले होते. शासनाने काही मागण्या मान्य केल्या आहेत. परंतु, ‘उमेद’ अभियानाच्या आस्थापनेस नियमित विभाग म्हणून मान्यता देण्याची मागणी प्रलंबित आहे. त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिला सक्षमीकरणासाठी ‘लाडकी बहीण’, ‘अन्नपूर्णा योजना’, बचत गटांच्या महिलांच्या खेळते भांडवलामध्ये दुप्पट वाढ, मुलींना उच्च शिक्षणापर्यंतचे शिक्षण मोफत, महिलांना पिंक रिक्षा वाटप करण्याचा निर्णय, महिलांना तिकिटात ५० टक्के मोफत प्रवास आदी योजना लागू केल्या आहेत. त्यामुळे राखी बांधून त्यांचे अभिनंदन करण्याचाही यामागे हेतू आहे, असल्याचे या संघटनेचे संघटनेचे महिला जिल्हाध्यक्ष वंदना जोगदंड व कर्मचारी जिल्हाध्यक्ष सचिन सोनवणे यांनी सांगितले.

पंचायत समितीपासून टेम्पो रवानाप्रत्येक तालुक्यातून प्राप्त झालेले राख्यांचे बॉक्स एका टेम्पोद्वारे रविवारी दुपारी मुंबईकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत दुसऱ्या वाहनातून विलास झाल्टे, कृष्णा बनसोडे, राजू सय्यद, श्रीकृष्ण केंद्रे, सखुबाई पवार, हिना शेख, रंजना काकडे, सरला काकडे, सोनाली देशमुख, मीना भगुरे, मनीषा बोराडे, सोनाली मोरे, वंदना जाधव, मुक्ता गाडेकर, राधा जाधव, निर्गुणा सोमदे, सिंधू शिनगारे, पुष्पा बोरणारे, विजया वाणी, प्रतिभा पुरी, वंदना जोगदंड, रेखा बोराडे आदी गेले आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदेRaksha Bandhanरक्षाबंधनWomenमहिला