शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

एक विधानसभा, पाच लोकांना शब्द कसा पाळणार? बॅनरबाजीतून उद्धव ठाकरेंना सवाल

By संतोष हिरेमठ | Updated: July 10, 2024 20:05 IST

छत्रपती संभाजीनगरात उद्धवसेनेतील गटबाजी, नाराजी की विरोधकांचा डाव?

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अमरप्रित चौकात सोमवारी रात्री ‘एक विधानसभा, ५ लोकांना शब्द कसा पाळणार’ असा सवाल करणारे बॅनर झळकले. उद्धवसेनेतील गटबाजी, विधानसभेसाठी ‘पश्चिम’मधून उमेदवारीसाठी इच्छुकांच्या नाराजीतून हे बॅनर लागले की, ही विरोधकांची खेळी आहे, अशी चर्चा मंगळवारी दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली होती.

या बॅनरमधून थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सवाल करण्यात आला. या बॅनरचा फोटो सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाला. त्याविषयी एकच चर्चा सुरु झाली. हे बॅनर मंगळवारी मात्र हटविण्यात आले. हे बॅनर नेमके कोणी लावले, हे समजू शकले नाही. बॅनर कोणी लावले, यावरून वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या.

काय लिहिले बॅनरवर?‘कधी तरी शब्द पाळणार का उद्धवजी’, ‘लाेकसभा निवडणूक काढण्यासाठी दिलेला शब्द पाळणार का? उद्धवजी’ आणि ‘एक विधानसभा, पाच लाेकांना शब्द कसा पाळणार उद्धवजी’ असे या बॅनरवर लिहिले होते.

उद्धवसेनेतील इच्छुकलोकसभेतील पराभवानंतर खैरे हे आमदार संजय शिरसाट यांच्याविरुद्ध ‘पश्चिम’मधून विधानसभेच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहे. उद्धवसेनेचे तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, जिल्हा सहसंपर्कप्रमुख विजय साळवे यांच्याकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येते. मात्र, आता राजू शिंदे यांच्या प्रवेशाने उद्धवसेनेकडून ‘पश्चिम’मधून त्यांनाच विधानसभेची उमेदवारी दिली जाईल, अशीही चर्चा आहे.

शब्द नाहीमातोश्रीवरून कोणालाही असा शब्द दिला जात नाही. मूल्यमापन केले जाते. पक्षश्रेष्ठींचा निर्णय सर्वांना मान्य असतो, मलाही असा काही शब्द दिलेला नाही. हे बॅनर लावण्याचे काम विरोधकांचे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.- विजय साळवे, जिल्हा सहसंपर्कप्रमुख, शिवसेना (उद्धवसेना)

शब्द नाही, आदेश दिला तर मी लढेनपक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणालाही शब्द दिलेला नाही. आदेश दिला तर ‘पश्चिम’मधून मी उभा राहील. कारण आमदार संजय शिरसाट यांना विधानसभा निवडणुकीत पाडणे गरजेचे आहे. सध्या जे काही सुरू आहे, ते सर्व उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत जाईल.- चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते (उद्धवसेना)

मूल्यमापन करूनच उमेदवारीपक्षात असा शब्द दिला जात नाही. पक्षात केलेल्या कामाचे मूल्यमापन केले जाते. जो विजयी होऊ शकतो, अशांनाच उमेदवारी दिली जाते. ज्यांचा पक्षाशी, मतदारसंघाशी संबंध नाही किंवा पदावर असूनही सक्रिय नाही, अशा लोकांचा पक्ष विचार करू शकतो का, हाही प्रश्न आहे.- राजू वैद्य, महानगरप्रमुख, शिवसेना (उद्धवसेना)

टॅग्स :AurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024