शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘एक दिवस शरद पवारांना देखील ‘पुतण्या’ आठवेल!’; गोपीनाथ मुंडेंची भविष्यवाणी खरी ठरली!

By नंदकिशोर पाटील | Updated: April 24, 2024 11:47 IST

भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले अजितदादा ‘टायमिंग’ साधतील का, हा खरा उत्सकतेचा विषय आहे.

छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्राच्या राजकारणात तसे अनेक ‘दादा’ लोक आहेत. पण सध्या चर्चा आहे एकाच दादांची ते म्हणजे, अजितदादा! राज्य मंत्रिमंडळात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रिपदाचा सांभाळण्याचा एक आगळा विक्रम नावावर असलेले अजित पवार सध्या काकांकडून पळविलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर लोकसभा निवडणुकीत उतरले आहेत. भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले अजितदादा ‘टायमिंग’ साधतील का, हा खरा उत्सकतेचा विषय आहे.

१३ जून २०१३ साली गोपीनाथ मुंडे यांचे एक भाषण औरंगाबाद (तेव्हाचे) शहरातील संत एकनाथ रंगमंदिरात झाले होते. व्यासपीठावर विलासराव देशमुख, आर. आर. पाटील, पृथ्वीराज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. विनायकराव मेटे यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता. या समारंभात मुंडे यांनी जोरदार भाषण केले. हसून-हसून उपस्थितांची पुरेवाट झाली. विषय पुतण्याचा निघाला. त्यावर मुंडे म्हणाले, ‘हल्ली राज्यातील पुतणे मंडळींना काय झालेय हेच कळेना! जो तो उठतो आणि मला वेगळं व्हायचंय म्हणतो!’ गोपीनाथरावांच्या या वाक्यावर सभागृहात जो हशा आणि टाळ्यांचा कडकडाटा झाला, तो आजही एकनाथ रंगमंदिरात घुमतो आहे. मुंडे पुढे जे बोलले ते खूप म्हत्त्वाचे आहे. ते म्हणाले, ‘लिहून घ्या, एक दिवस शरद पवारांना देखील ‘पुतण्या’ आठवेल!’ गोपीनाथरावांची ही भविष्यवाणी अकरा वर्षांनंतर खरी ठरली! आज मुंडे असते, तर त्यांनी हा किस्सा नक्कीच ऐकवला असता.

असो. शरद पवार यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याच्या तालमीत वाढलेल्या, त्यांच्याकडूनच राजकारणातील डावपेच शिकलेल्या अजित पवारांनी आपल्या काकांवर नव्हे तर, राजकीय गुरूंवर असा डाव टाकला की, गुरूंची तालीम आणि तालमीतील बहुसंख्य शिष्यगण पळवले! शिवाय, तालमीला स्वत:चे नावही लावले. महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर अनेकांनी बंड केले. मात्र, सर्वाधिक चर्चा झाली ती अजित पवारांच्या बंडखोरीची! का नाही होणार? महाराष्ट्रातील मुंडे, मोहिते, नाईक, निंबाळकर या सारखी मोठी घराणी फुटली तरी, पवार घराण्यात दुभंग निर्माण होईल आणि अजित पवार कुटुंबातून बाहेर पडतील, अशी कल्पना देखील कोणी केली नव्हती. पण भाजपच्या चाणक्यांनी डावपेच आखले आणि अजितदादांचे पाऊल उंबऱ्याबाहेर पडले!

पक्ष फोडल्याची बक्षिसी काय?अजित पवार यांना राष्ट्रवादी फोडल्याची बक्षिसी म्हणून उपमुख्यमंत्रिपद आणि आठ मंत्रिपदं मिळाली. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात त्यांच्या वाट्याला केवळ पाच जागा आल्या आहेत. त्यातही परभणीची जागा रासपचे महादेव जानकर यांना गेली आहे, तर शिरूरमध्ये शिवसेनेचे आढळराव पाटील यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी द्यावी लागली. उस्मानाबादमध्ये भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी द्यावी लागली. उरल्या फक्त दोन जागा. बारामती आणि रायगड. तिथे अनुक्रमे पत्नी सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे हे दोनच उमेदवार खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

नऊ आमदार, तरी जागा एकचराष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यानंतर मराठवाड्यातील तब्बल नऊ आमदार (विधान परिषदेवरील दोघांसह) अजित पवार यांच्यासोबत गेले. बीडचे संदीप क्षीरसागर हे एकमेव आमदार शरद पवार यांच्यासोबत राहिले. वास्तविक, मराठवाडा हा शरद पवारांना मानणारा प्रदेश आहे. १९७८ साली पुलोद सरकार स्थापन केले तेव्हा माजलगावचे सुंदरराव सोळंके यांना उपमुख्यमंत्रिपद दिले होते. असे असताना या प्रदेशातील बहुसंख्य आमदार अजित पवारांसोबत गेले. मात्र आमदारांच्या संख्येच्या तुलनेत त्यांना मराठवाड्यात केवळ उस्मानाबादची जागा मिळाली. तिथेही उमेदवार आयात करावा लागला. वास्तविक, परभणीत त्यांच्याकडे राजेश विटेकर यांच्यासारखा सक्षम उमेदवार होता. मागील निवडणुकीत विटेकर यांनी चांगली लढत दिली होती. परभणीत वंचितचा उमेदवार नसता तर विटेकर विजयी झाले असते. मात्र, बारामतीत धनगर समाजाची मते मिळावीत म्हणून ही जागा आता रासपच्या महादेव जानकरांना देण्यात आल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज आहेत. बीडचे बजरंग सोनवणे यांनी अजितदादांची साथ सोडून शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळवली. बीडमधील अजितदादांच्या तीन आमदारांना भाजपचा प्रचार करावा लागणार आहे.

टॅग्स :baramati-pcबारामतीbeed-pcबीडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४aurangabad-pcऔरंगाबाद