शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

औरंगाबाद जिल्ह्यात पालावर राहणाऱ्या एक लाखावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 15:53 IST

जिल्ह्यात १ लाखावर नागरिकांचे वास्तव्य पालावर असून धुळ्यातील राईनपाडा येथील घटनेनंतर जवळपास ५५ जातसंवर्गातील नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देधुळ्यातील राईनपाडा येथील घटनेनंतर पूर्ण भटक्या जाती-जमातींमध्ये असुरक्षिततेची भावना बळावली आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात १ लाखावर नागरिकांचे वास्तव्य पालावर असून धुळ्यातील राईनपाडा येथील घटनेनंतर जवळपास ५५ जातसंवर्गातील नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. राईनपाडा घटनेच्या निषेधप्रकरणी भटक्या विमुक्त बहुजन महासंघातर्फे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना निवेदन देण्यात आले. 

निवेदन देण्यापूर्वी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, जिल्ह्यात १ लाखाच्या आसपास भटक्या विमुक्त नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यांच्या ओळखीसाठी कुठलेही ओळखपत्र त्यांच्याकडे नाही. ५५ जातींच्या प्रवर्गांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यातील अनेकांकडे रेशन कार्ड, आधार कार्ड नाही. अनेकांचे पारंपरिक व्यवसायाचे साधन आधुनिकीकरणामुळे संपुष्टात आले आहे. बहुरूपी, डोंबाऱ्यांना गावोगावी फिरून उदरनिर्वाह करण्यासाठी भटकावे लागत आहे. या सगळ्या जातींना रोजगाराच्या संधी जोपर्यंत मिळत नाहीत. तोपर्यंत हे स्थिर होणार नाहीत.

धुळ्यातील राईनपाडा येथील घटनेनंतर पूर्ण भटक्या जाती-जमातींमध्ये असुरक्षिततेची भावना बळावली आहे. धान्य सुरक्षितता योजनेतही भटक्या जमातीच्या नागरिकांचा समावेश नाही. त्यांच्यासाठी रेशन कार्ड आणि आधार कार्ड शिबीर घेण्यात यावे, अशी मागणी महासंघ अध्यक्ष अ‍ॅड. शिरीष जाधव यांनी केली. यावेळी अध्यक्ष अ‍ॅड. जाधव, केशवराव मोहरकर, कृष्ण बोटुूळे, राजेंद्र गायकवाड, जगन बाबर, शिवाजी कंटक, शंकर सावंत, सर्जेराव बाबर, भरत सोळुंके, शिवाजी शिंदे, भरत सावंत, एकनाथ शिंदे, ईश्वर जगताप, विश्वनाथ शिंदे आदींची उपस्थिती होती. 

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केल्या मागण्याराईनपाडासह राज्यात भटक्या विमुक्तांच्या हत्या करणाऱ्यांवर भादंवि ३०२ चा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. सदरील कुटुंबातील एकास शासकीय सेवेत नोकरी द्यावी. सरकारतर्फे  २५ लाखांची मदत देण्यात यावी. बार्टी, सार्थीसारखी स्वतंत्र संस्था भटक्या विमुक्तांसाठी स्थापन करावी. या व इतर अनेक मागण्यांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. 

टॅग्स :Child Kidnapping Rumoursबालकांचे अपहरण अफवाAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादDr Purushottam Bhapkarडॉ पुरुषोत्तम भापकर