शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

मनपाला अभय योजनेतून अपेक्षा होती १०० कोटींची, मात्र मिळाले केवळ १८ कोटीच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 12:53 IST

मालमत्ताकरावर लावण्यात आलेले व्याज, दंड माफ करून मूळ रक्कम भरून घेण्याची योजना मनपाने दीड महिन्यांपूर्वी सुरू केली.

ठळक मुद्देशहरातील मालमत्ताधारकांकडे सुमारे २३० कोटी रुपयांची थकबाकी आहे. अभय योजनेत थकबाकी भरणाऱ्यांना व्याज व दंडाच्या रकमेमध्ये ७५ टक्के सूट देण्यात येते

औरंगाबाद : मालमत्ताकरावर लावण्यात आलेले व्याज, दंड माफ करून मूळ रक्कम भरून घेण्याची योजना मनपाने दीड महिन्यांपूर्वी सुरू केली. २३० कोटी रुपयांची थकबाकी नागरिकांकडे असल्याने किमान १०० कोटी रुपये तरी जमा होतील अशी अपेक्षा होती. पन्नास दिवसांमध्ये फक्त १८ कोटी ५० लाख रुपये प्राप्त झाले. या रकमेतही नियमित कर भरणाऱ्यांचा समावेश आहे. मनपाच्या अभय योजनेला मालमत्ताधारकांकडून अजिबात प्रतिसाद न मिळाल्याने ३१ मेनंतर मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

शहरातील मालमत्ताधारकांकडे सुमारे २३० कोटी रुपयांची थकबाकी आहे. वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही रक्कम वसूल होत नसल्याने प्रशासनाने अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला. पुणे महापालिकेने शासनाची परवानगी मिळवून ही योजना राबविली होती. औरंगाबाद महापालिकेनेही शासन निर्णयाच्या अधीन राहून ही योजना राबविली. थकबाकी भरणाऱ्यांना व्याज व दंडाच्या रकमेमध्ये ७५ टक्के सूट देण्यात येत आहे. १ एप्रिलपासून ३१ मे पर्यंत दोन महिन्यांसाठी ही योजना आहे. अभय योजना जाहीर होऊन दीड महिना उलटला असला तरी मालमत्ताधारक कर भरण्यास समोर येत नसल्याचे चित्र आहे.

आतापर्यंत केवळ १८ कोटी ५० लाख रुपयांची वसुली झाली असल्याचे महापौरांनी सांगितले. महापालिकेला या योजनेतून किमान १०० कोटी रुपयांची अपेक्षा होती; मात्र अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने यापुढे अभय योजनेला मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. महापालिकेच्या तिजोरीत गेल्या दीड महिन्यांत १८ कोटी ५० लाख रुपये जमा झाले असले तरी अभय योजनेचा लाभ किती जणांनी घेतला, याची आकडेवारी उपलब्ध नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये नियमित वसुलीचाही समावेश आहे. 

१४० कर्मचारी वसुलीसाठीनोव्हेंबर २०१७ मध्ये मालमत्ता कराच्या वसुलीसाठी आऊटसोर्सिंगमार्फत मनपाने १४० कर्मचारी नेमले आहेत. प्रत्येक झोनला किमान १२ ते १५ कर्मचारी नियुक्त केले आहेत.एवढ्या मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ नेमल्यानंतरही मार्चअखेरपर्यंत वसुली मागील वर्षीच्या तुलनेत कमीच होती. १ एप्रिलपासून या कर्मचाऱ्यांना पुन्हा वसुलीसाठी म्हणून नेमण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारावर जेवढी रक्कम खर्च होत आहे, त्या तुलनेत वसुलीत किंचितही वाढ झालेली नाही. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकरMONEYपैसा