शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांची १७० कोटी थकबाकी देणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 15:52 IST

यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना सुरू होणे शक्य

औरंगाबाद : राज्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांच्या वीजबिलाची १७० कोटी रुपये थकबाकी देण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना सुरू होणे शक्य होणार आहे, असे मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर निंबाळकर यांनी बुधवारी सांगितले. 

जूनपर्यंत वीजबिल भरण्यात येणार आहे. वीजबिल थकल्यामुळे महावितरण कंपनीने ग्रामीण पुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे पाणी असूनही विजेअभावी ग्रामपंचायतींना उपसा करणे शक्य नव्हते. थकबाकी देण्याचा निर्णय झाल्यामुळे ग्रामीण भागांना दिलासा मिळणार आहे. विभागातील दुष्काळ, जलसाठा, चाराटंचाईच्या अनुषंगाने निंबाळकर यांनी आढावा बैठक घेतली. मराठवाड्यात चाराटंचाई जाणवणार नाही, असे सांगून निंबाळकर म्हणाले, जायकवाडी सध्या मृत साठ्यात आलेले आहे. विभागात ४ टक्के जलसाठा आहे. 

३०० ते ३ हजारांपर्यंत जनावरे चारा छावणीत राहतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या काही योजनांचा विचार केला जात आहे. चारा आहे; परंतु त्याची वाहतूक करावी लागणार आहे. त्या दृष्टीने नियोजन केले आहे. तात्पुरती पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय झाला आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे लाईटबिल थकले होते. त्यासाठी १७० कोटी रुपये शासनाने देऊ केले आहेत. दुष्काळ अनुदान वाटपाच्या अनुषंगाने निर्णय झाला आहे. सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. 

मराठवाड्यात रबीत पेरणी कमी मराठवाड्यात एक, दोन जिल्हे वगळता रबी हंगामात पेरणी झालेली नाही. भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, पुणे व साताऱ्यात रबी हंगामाची माहिती जाहीर करण्यात येणार आहे. खरिपामध्ये जे तालुके दोन्ही ट्रिगरमध्ये होते. त्यानुसार विभागातील ४१ तालुक्यांचा विचार झाला. खरीप हंगाम हातातून गेलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप केले आहे. वाड्या, वस्त्यांवर  पाणीपुरवठा करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.अनुदान वाटपाची सॉफ्टवेअरवरून माहिती मिळते, असे निंबाळकर यांनी  सांगितले. 

टॅग्स :fundsनिधीState Governmentराज्य सरकारelectricityवीजgram panchayatग्राम पंचायत