शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
3
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
4
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
5
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
6
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
7
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
8
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
9
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
10
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
11
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
12
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
13
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
14
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
15
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
16
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
17
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
18
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
19
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
20
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ

पपई उत्पादनातून शेतकऱ्यांसमोर ठेवला आदर्श

By admin | Published: December 15, 2015 11:37 PM

प्रसाद आर्वीकर, परभणी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी वर्षभर शासनासोबत दोन हात करणाऱ्या कॉ़ विलास बाबर यांनी स्वत:च्या शेतीत अभ्यासपूर्ण बदल करीत शेतकऱ्यांसमोर एक परिपाठ निर्माण केला आहे़

प्रसाद आर्वीकर, परभणी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी वर्षभर शासनासोबत दोन हात करणाऱ्या कॉ़ विलास बाबर यांनी स्वत:च्या शेतीत अभ्यासपूर्ण बदल करीत शेतकऱ्यांसमोर एक परिपाठ निर्माण केला आहे़ सरकार आणि निसर्ग दोघेही साथ देत नाही, अशा वेळेला स्वत: खंबीर होऊन सक्षम बनावे, असा सल्ला त्यांनी यानिमित्ताने दिला़ कॉ़ विलास बाबर हे तालुक्यातील सुरपिंपरी येथील शेतकरी़ डाळींब, ऊस ही पिके पाणी नसल्याने पिके पूर्णत: मोडून काढली आणि यावर्षी निर्माण झालेल्या वातावरणाचा अभ्यास करीत पपईचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला़ तैवान ७८६ या वाणाच्या पपईची तीन एकरात लागवड केली़ विहिरींचे पाणी कमी झाल्याने शेततळे घेऊन पपईसाठी संरक्षित पाणीसाठा उपलब्ध केला़ सर्वसाधारणपणे पपईचे एकरी ४० टन उत्पन्न मिळते. मात्र आपण योग्य नियोजन केल्याने एकरी ५० टन उत्पन्न मिळेल, अशी आशा त्यांना आहे़ सध्या ६० टन पपई मुंबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविली आहे़ पपई हे सर्वात नाजूक पीक आहे़ लवकर रोगाचा प्रादुर्भाव होतो़ त्यामुळे प्रत्येक वेळी या पिकाची निगा राखत रोग होऊ नये, याची काळजी घेतली़ परिणामी आज दर्जेदार उत्पादन निघाले आहे आणि बाजारात चांगली मागणी मिळाली़ तज्ज्ञांचा सल्ला घेतला जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांवर संकटांची मालिका सुरू आहे़ अशा स्थितीत शेतकऱ्यांनी खर्च न वाढविता पिकांचे उत्पादन घ्यावे़ बाजारपेठेचा अभ्यास करावा़ आपल्याकडे कृषी विद्यापीठ आहे़ काही शेतकऱ्यांनी चांगले बदल करीत प्रयोगशीलता जोपासली आहे़ अशा तज्ज्ञांशी संपर्कात रहावे आणि संपूर्ण नियोजन करून पीक घ्यावे़ मी देखील हे बदल केले आहेत़ -कॉ़ विलास बाबर