शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

रेल्वेगाड्या उशिरा धावत असल्याने प्रवाशांनी केला काळ्या फिती बांधून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 12:41 IST

वारंवार उशीरा धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाचा निषेध म्हणून आज काळ्या फिती बांधून रेल्वे प्रवास केला. 

औरंगाबाद : वारंवार उशीरा धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाचा निषेध म्हणून आज काळ्या फिती बांधून रेल्वे प्रवास केला. 

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून नियमित प्रवास करणारे मासिक पास धारक प्रवाशांना उशीरा धावणाऱ्या रेल्वेंमुळे मनस्ताप होत आहे. कधी मेगा ब्लॉक, कधी इंजिनिअरिंग ब्लॉक तर कधी इंजीन नादुरुस्तीमुळे रेल्वेला उशीर होण्याचा प्रकार होत आहे. धर्माबाद-मनमाड हायकोर्ट एक्स्प्रेस, निजामाबाद-पुणे-निजामाबाद पॅसेंजर, काचिगुडा-मनमाड पॅसेंजर, हैदराबाद-औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजर, निजामाबाद-पंढरपूर-निजामाबाद या पाचही रेल्वे गेल्या एक वर्षापासून एक ते नऊ तासांपर्यंत उशीराने धावत आहे. कधी-कधी तर रेल्वे रद्दच करण्यात येते. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी जालना-मनमाड-जालना, जालना-परभणी-जालना, परभणी-मुदखेड-परभणी, परभणी-परळी-लातूर-परळी-परभणी नवीन डेमू शटल सुरु करण्यात यावी, मेगा ब्लॉक केवळ रविवार अथवा सुट्टीच्या दिवशी घेण्यात यावा,अशी मागणी प्रवाशांनी केली.

या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी प्रवाशांनी आज डोक्याला काळ्या फिती बांधून प्रवास केला. अनेकांनी काळ्या टोप्या, मफलर परिधान केले होते. प्रवाशांनी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर जोरदार घोषणा दिल्या. यावेळी रेल्वे प्रवाशी सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी , रामेश्वर बिलवने पाटील,अंबादास माडवगड ,दादासाहेब घोडके, गोरख गिरी,मनीष मुथा, अरुण भाग्यवान ,कृष्णा सरोवर यांच्यासह महिला, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

पहा व्हिडीओ :

टॅग्स :passengerप्रवासीrailwayरेल्वेAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशन