शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

'पिंजण रुबी'मुळे पारव्यांचे अस्तित्वच धोक्यात; अंधश्रद्धेतून मांस, रक्ताचा मोठा व्यापार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 12:10 IST

जंगली कबुतर म्हणजेच 'पारवा' हा निसर्ग समतोलासाठी महत्त्वाचा पक्षी आहे.

- श्यामकुमार पुरेसिल्लोड : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पक्षी हा महत्त्वाचा घटक असून, पक्षघात अथवा पॅरालिसिस झालेल्या व्यक्तीला कबुतरांचे मांस व रक्ताने मालिश आणि इंजेक्शन घेतल्याने फरक पडतो, या अंधविश्वासातूनही कबुतरांचा बळी घेण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी कबुतरांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे.

जंगली कबुतर म्हणजेच 'पारवा' हा निसर्ग समतोलासाठी महत्त्वाचा पक्षी आहे. ग्रामीण भागात याच पारव्याचा पक्षघात -लकवा-पॅरालिसिस या आजारावर उपचारासाठी अघोरी पद्धतीने सर्रास वापर केला जातो. रानटी कबुतराचे रक्त व मांस गरम प्रकृतीचे असते. त्यामुळे लकवा बरा करण्यासाठी पारव्यांचा जीव घेतला जात आहे. या कबुतरांच्या पायातील जुगुलर व्हेनमधून रक्त काढले जाते व ते गोठण्याच्या आतच ते लकवा झालेल्या व्यक्तीच्या कमरेत स्नायूमध्ये इंजेक्शनने टोचले जाते. अवघ्या २ मिनिटांच्या आतच या पक्षाचे रक्त गोठते. त्यामुळे तत्सम वैदू व उपचारकर्ते घाईतच ते टोचतात. त्यातून अनेकदा गुंतागुंत ही उद्भवते. यास वैद्यकशास्त्रीय असा कुठलाही आधार नाही. बऱ्याच जणांना या रक्ताची ॲलर्जी ही होते. सोबत या पक्ष्याचे मांसही लकवाग्रस्त व्यक्तीस खाऊ घालतात तर याचे रक्त काढून लकवा झालेल्या भागात चोळले जाते. असे हे पक्षी अनेक कामी मारले जातात. रक्त वाळल्यावर अंगात ताठरपणा जाणवतो व हाच फायदा काहीजण समजतात. ही जंगली कबुतरे, मासे पकडण्याचे जाळे लावून पकडली जातात. विशेषतः विहिरीमध्ये ती अधिवास करतात. रात्री ती विहिरीत निवांत पडलेली असताना विहिरीवर जाळे टाकून, आवाज करून त्यांना पकडले जाते.

रक्ताचा अंगठीतील खड्यासाठी उपयोगकबुतराचे रक्त वाळल्यावर दगडासारखे टणक बनते व या वाळलेल्या रक्ताच्या खड्यांपासून पिजण रुबी जेम्स नावाचे रत्न (खडे) बनवले जातात. हे रत्न अंगठीमध्ये परिधान करणे भाग्यशाली समजले जाते, मात्र अनेक जंगली कबुतरे याकामी नाहक मारली जात आहेत.

ही तर अंधश्रद्धापक्षी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. मात्र, अंधश्रद्धेपोटी अनेक पक्ष्यांची शिकार होत आहे. अभिनव प्रतिष्ठानमार्फत आम्ही याबाबत जनजागृती करीत आहोत. आजपर्यंत शिकाऱ्याच्या तावडीतून अनेक पक्षी सोडविले आहेत. याकडे वनविभागाने लक्ष दिले पाहिजे. नागरिकांनीही लकव्यावर वैद्यकीय उपचार घ्यावेत, विनाकारण पक्ष्यांचा बळी घेऊ नये.- डॉ. संतोष पाटील, वन्यजीव अभ्यासक, सिल्लोड

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादforestजंगल