शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट

By admin | Published: March 24, 2017 11:47 PM

बीड तूर खरेदीस सुरुवात झाली असली तरी मापात पाप होत असल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे.

राजेश खराडे बीडअद्यापपर्यंत बारदाणाशिवाय जागेअभावी तुरीची अनेक वेळा रखडली होती. अनंत अडचणींवर मात करून तूर खरेदीस सुरुवात झाली असली तरी मापात पाप होत असल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. काट्यावर वजन होत असतानाच हमाल-मापाड्यांकडून शेतकऱ्यांची तूर काढून घेतली जात असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंगमधून समोर आले आहे.कृउबाच्या प्रवेशद्वारातून खरेदी केंद्रावरील वजन काट्यावर तूर जाण्यासाठी दोन-तीन दिवसांचा कालावधी लागत आहे. वाढत्या उन्हामुळे वजनात घट ही नैसर्गिक असली तरी काट्यावर मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा मालच काढून घेतला जात आहे. वजनापूर्वी तुरीची चाळणी केली जाते. चाळण्यातून पडणारी तूर मापात न धरता थेट हमाल स्वत:च्या पदरात पाडून घेत आहेत. तुरीचे वजन होत असताना शेतकऱ्यांपेक्षा हमाल-मापाड्यांचीच लगबग अधिक प्रमाणात पाहावयास मिळते. एका कट्ट्यामागे जवळपास दीड ते दोन किलो तूर काढली जात आहे. शिवाय बारदाण्याच्या वजनापोटी १ किलो अधिकची तूर घेतली जात आहे. त्यामुळे ५० किलोमागे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना तब्बल ३ किलोचा फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सुरू केलेली ही केंद्रे त्यांच्यासाठी मारक ठरत आहेत.