शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

वक्फ मालमत्तांची पोलिसांकडून चौकशी

By admin | Published: January 16, 2016 11:57 PM

औरंगाबाद : शहरात अनेक वक्फ मालमत्तांवर अतिक्रमणे झाली आहेत. काही ठिकाणी वक्फ अधिकाऱ्यांनाच हाताशी धरून खोटी कागदपत्रे तयार करून कोट्यवधी रुपयांच्या जागा बळकावण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद : शहरात अनेक वक्फ मालमत्तांवर अतिक्रमणे झाली आहेत. काही ठिकाणी वक्फ अधिकाऱ्यांनाच हाताशी धरून खोटी कागदपत्रे तयार करून कोट्यवधी रुपयांच्या जागा बळकावण्यात आल्या आहेत. वक्फ मालमत्तांसंदर्भात प्राप्त होणाऱ्या तक्रारीनंतर शनिवारी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आर्थिक गुन्हे शाखेला चौकशीचे आदेश दिले. क्रांतीचौक येथे वक्फ बोर्डाची ७ एकरपेक्षा अधिक जागा आहे. या जागेवर अगोदरच मोठमोठ्या टुमदार इमारती उभ्या आहेत. क्रांतीचौकात मागील आठवड्यात हरप्रीतसिंग निऱ्ह यांनी ज्युबिली पान सेंटर हटवून जागेचा ताबा घेतला होता. या जागेची कोणतीही कागदपत्रे त्यांच्याकडे नसताना त्यांनी ताबा घेतला होता. शुक्रवारी आ. इम्तियाज जलील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी निऱ्ह यांनी ताबा घेतलेल्या जागेवर जाऊन लोखंडी जाळ्या तोडून टाकल्या. तेथील लोखंडी बोर्डही उखडून फेकला. यावेळी वक्फ अधिकारीही उपस्थित होते. जागेचा ताबा एमआयएमने वक्फ अधिकाऱ्यांना मिळवून दिला होता. दरम्यान, शनिवारी सकाळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार आ. जलील यांच्यासह दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखलक्रांतीचौक येथील वक्फ बोर्डाच्या जमिनीवरून शुक्रवारी एमआयएमचे आ. इम्तियाज जलील व कार्यकर्त्यांनी मोठा राडा केला होता. क्रांतीचौकात वक्फ बोर्डाची ७ एकरांहून अधिक जागा आहे. मुख्य रस्त्यावर वक्फ बोर्डाने काही नागरिकांना भाडे करारावर जागा दिली आहे. या जागेवर मागील आठवड्यात हरप्रीतसिंग निऱ्ह यांनी लोखंडी जाळी लावून ताबा मिळविला होता. या घटनेनंतर शुक्रवारी ‘एमआयएम’ने वक्फ बोर्डाला परत जागेचा ताबा मिळवून दिला होता. त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून जागा ताब्यात घेण्यासाठी येथे बळाचा वापर केला. साहित्याची तोडफोड केली. या प्रकरणी विशेष शाखेचे एस.बी. धुमाळ यांच्या फिर्यादीवरून आ. जलील यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून हरप्रीतसिंग निऱ्ह यांच्याविरुद्ध अतिक्रमण करणे आणि जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळविणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.