शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
3
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
4
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
5
पराग शाह 500 कोटी तर मंगलप्रभात लोढा 441 कोटींचे धनी
6
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
7
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
8
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
9
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
10
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
11
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच
12
कोणताही आयपीओ घेणे शहाणपणाचे ठरेल का? लिस्टिंग गेनच्या लालसेने पैसे लावणे घातक
13
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
14
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
15
२०३५ पर्यंत ईव्हींसाठी लागेल ६ ते ९ टक्के वीज
16
स्पर्धा परीक्षेत गडबड, तर 5 वर्षे कैद; 10 लाख दंड होणार
17
बंदूक साेड, घरी परत ये लाडक्या! दाेन अतिरेक्यांच्या पित्यांचे मतदानानंतर भावनिक आवाहन
18
वाराणसीच्या मंदिरांतील साईबाबांच्या मूर्ती हटवल्या
19
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
20
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव

दिवाळीनंतर फुटणार राजकीय फटाके

By admin | Published: November 14, 2015 12:10 AM

कळंब : शहरात अनियमित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, पालिकेच्या पाणीपुरवठा समितीतील चार सदस्यांनी राजीनामा देण्याची तयारी सुरू केली आहे़

कळंब : शहरात अनियमित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, पालिकेच्या पाणीपुरवठा समितीतील चार सदस्यांनी राजीनामा देण्याची तयारी सुरू केली आहे़ परिणामी दिवाळीनंतर पाणीप्रश्नावरून पालिकेत राजकीय फटाके जोरात फुटण्याची शक्यता आहे़शहराच्या काही भागात सध्या सात ते आठ दिवसाआड तर काही भागात चार ते पाच दिवसाआड पाण्याचा पुरवठा केला जातो़ पालिका प्रशासनाच्या कारभारावर विसंभून न राहता काही सदस्यांनी आपापल्या प्रभागात स्वखर्चाने पाणी उपलब्ध करून दिले आहे़ एकंदरीत शहरात पाणी समस्येवरून नागरिकांमध्येही असंतोष दिसत आहे़ मांजरा धरणातून शहराला पाण्याचा पुरवठा होता़ हा पाणीपुरवठा दीर्घकाळ टिकणार नाही, या कारणाने नगर पालिकेने पाणी कपात करून बचतीचा मार्ग अवलंबिला आहे़ परंतू धरणात पाणीसाठा आहे, तोपर्यंत पुरेसा व नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शहरवासियांतून होत आहे़ शहरवासियांच्या या मागणीला पालिका प्रशासन मात्र दाद देताना दिसत नाही़ मांजरा धरणातून इतर शहर तसेच गावांना पाण्याचा पुरवठा होतो़ त्या ठिकाणी पाणी बचत करण्यासाठी पाणी कपात होते का ? हे पाहून नगर पालिकेने धोरण ठरवावे, अशी मागणीही होत आहे़शहरातील पाणी समस्या पाहता पाणी पुरवठा समितीवरील सदस्य पांडुरंग कुंभार, संजय मुंदडा, कांतीलाल बागरेचा व छायाताई आष्टेकर या नगरसेवकांनी समितीच्या बैठकीत शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे लेखी आदेश पाणीपुरवठा विभागाला दिले होते़ या आदेशाला केराची टोपली दाखवून सात ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे धोरण कायम ठेवण्यात आले आहे़ पालिकेतील काही मंडळींच्या दबावामुळे पाणीपुरवठा विभागाने समितीचे आदेश धुडकावल्याची चर्चाही सुरू आहे़ पाणी पुरवठ्याचे श्रेय विरोधकांना जाऊ नये, यासाठी समितीच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे़ या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा समितीचे चार सदस्य १६ नोव्हेंबर रोजी राजीनामे देणार असल्याचे वृत्त आहे़ (वार्ताहर)