शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

बरखास्तीवरुन राजकारण तापले

By admin | Published: April 23, 2016 11:41 PM

उदगीर : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बरखास्तीवरुन उदगीरात चांगलेच राजकारण तापले आहे़ बाजार समिती ताब्यात ठेवून असणाऱ्या

उदगीर : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बरखास्तीवरुन उदगीरात चांगलेच राजकारण तापले आहे़ बाजार समिती ताब्यात ठेवून असणाऱ्या माजी आ़चंद्रशेखर भोसले यांनी ही बरखास्ती म्हणजे राजकीय सूडबुद्धी असून, विद्यमान आमदारांनी आता कोणत्याही कुबड्या न घेता थेट निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान दिले़ तर आमदार सुधाकर भालेराव यांनी ही तर सुरुवात आहे, असा सूचक इशारा दिला़बाजार समितीत एक रुपयाचाही भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा भोसले यांनी केला़ बरखास्तीच्या आदेशात कोठेही भ्रष्टाचार झाल्याचा उल्लेख नाही़ आपण पारदर्शकच कारभार केला़ मात्र, केवळ अनियमतता व योजनांना मंजुरी न घेतल्याच्या मुद्यावरुन बरखास्तीचा निर्णय घेण्यात आला आहे़ बालिका बचाव योजना, शेतकरी विमा योजना, आरोग्य योजना या शेतकऱ्यांच्या हिताच्याच होत्या़ परंतु, केवळ राजकीय सूडबुद्धीने नियमावर बोट ठेवत बरखास्तीची कारवाई करण्यात आली आहे़ याविरोधात आम्ही आधीच न्यायालयात गेलो आहोत़ ३ महिने प्रतिष्ठा पणाला लावून सत्तेचा दुरुपयोग करण्यात आल्याचा आरोप करीत एवढाच वेळ आमदारांनी उदगीरच्या पाणीप्रश्नाला देणे गरजेचे होते, असे मतही चंद्रशेखर भोसले यांनी व्यक्त केले़ दरम्यान, बाजार समितीच्या निवडणुकीचे घोडामैदान दूर नाही़ त्यात आमदारांनी स्वबळावर उतरुन दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले़ आमदार सुधाकर भालेराव यांनी सांगितले की, बाजार समितीच्या भ्रष्टाचाराबाबत बोलायचे झाल्यास वेडा कधी स्वत:ला वेडा म्हणवून घेत नाही, अशी ‘त्यांची’ अवस्था आहे़ गैरकारभार झाल्याशिवायच का बरखास्ती झाली आहे? लढण्याचे म्हणाल तर शेतकऱ्यांची फसवणूक व भ्रष्टाचार याविरुद्ध आपण कायमच लढत आहोत़ ही लढाई पुढेही लढणार आहोतच़ भ्रष्टाचार मुळासकट उपसून टाकून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे़ शेतकऱ्यांच्या हिताच्या नावाखाली सुरु केलेल्या योजनांतून लूट झाल्याचा आरोप करीत तेही लवकरच बाहेर येईल, असे भालेराव म्हणाले़(वार्ताहर)