शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

कालबाह्य वाहनांच्या वापरामुळेच शहरात प्रदूषण

By admin | Published: March 11, 2016 12:54 AM

जालना : शहरात वाहनांमुळे प्रदूषण वाढत असल्याचे ६० टक्के नागरिकांचे म्हणणे आहे. तर कालबाह्य वाहनांमुळे प्रदूषणास मोठा हातभार लागत असल्याचे तब्बल ८० टक्के नागरिकांचे मत आहे.

जालना : शहरात वाहनांमुळे प्रदूषण वाढत असल्याचे ६० टक्के नागरिकांचे म्हणणे आहे. तर कालबाह्य वाहनांमुळे प्रदूषणास मोठा हातभार लागत असल्याचे तब्बल ८० टक्के नागरिकांचे मत आहे. लोकमतने वाढत्या प्रदूषणाबाबत सर्व्हेक्षण करून नागरिकांची मत जाणून घेतले. यावेळी अनेकांनी या प्रश्नांसोबतच इतर प्रश्नही उपस्थित करून प्रदूषण मंडळावर बोट ठेवले. लोकमत सर्व्हेक्षणासाठी नागरिकांना पाच प्रश्न विचारण्यात आली. शहरात वाहनांमुळे प्रदूषण वाढले आहे का? या प्रश्नावर ६० टक्के नागरिक होय म्हणतात. ३० टक्के नागरिकांना हे चुकीचे वाटते तर १० टक्के नागरिकांना याची माहिती नसल्याने ते तटस्थ राहिले. कालबाह्य वाहनांच्या वापरामुळे प्रदूषण वाढते का यावर ८० टक्के नागरिक होय म्हणतात. ५ टक्के नाही म्हणतात तर १५ टक्के नागरिक याबाबत अनभिज्ञ आहेत. कालबाह्य वाहनांमुळेच प्रदूषण वाढत असल्याचे बहुतांश नागरिकांचे म्हणणे आहे. वाहनचालकांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ जागृती करते का? २० टक्के होय म्हणतात. ७५ टक्के नागरिक नाही म्हणतात. ५ टक्के नागरिकांचे काहीच म्हणणे नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा वाढत्या प्रदूषणाकडे कानाडोळो हातोय का? यावर ५५ टक्के नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळावरच खापर फोडले. ३० टक्के नाही म्हणतात. १५ टक्के नागरिकांना याबाबत माहीत नाही असे उत्तर दिले. पीयूसी करण्याबाबत वाहनचालक आग्रही आहेत का? ४५ टक्के नागरिक होय म्हणतात.५० टक्के नाही म्हणतात तर ५ टक्के माहीत नाही म्हणतात. एकूणच नागरिकांनी वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. लोकमतने विचारलेल्या प्रश्नांवर नागरिकांनी मते नोंदवून आपल्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी तिखट प्रतिक्रिया देत प्रशासनाला धारेवर धरले. स्थानिक प्रदूषण नियंत्रण मंडळ स्थापन करावे, अशी मागणीही काहींनी व्यक्त केली. काही वाहनचालक रिक्षा, दुचाकी तसेच जीप व ट्रकमध्ये सर्रास रॉकेलचा वापर करतात. यामुळेही प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही वाहने कालबाह्य झाल्यानंतरही थोडीबहुत दुरूस्ती करून धावतात.यामुळेही प्रदूषण वाढत आहे. शहरातील प्रदूषणासोबतच धुळीचा प्रश्नही गंभीर बनल असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. प्रदूषण व धुळीमुळे श्वसनाचे आजार जडत असल्याचे काही वयोवृद्ध वाचकांनी सांगितले. (प्रतिनिधी)