शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

'बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प ‘वॉटरग्रेस’ला द्यावा'; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा मनपावर ‘लेटर बॉम्ब’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 19:23 IST

मनपाने गोवा येथील बायोटेक कंपनीला काम सुरू करण्याचे निर्देशही दिले आहेत

छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया न करणाऱ्या ‘वॉटरग्रेस’ कंपनीची मनपाने हकालपट्टी केली. निविदा पद्धतीने मनपाने गोवा येथील बायोटेक कंपनीची निवड केली. त्यानंतर आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने मनपावर ‘लेटर बॉम्ब’ टाकून, प्रकल्प जुन्या वॉटरग्रेस कंपनीला द्यावा, असा अजब सल्ला दिला.

शहर आणि परिसरातील वैद्यकीय कचरा संकलित करणे, त्यावर प्रक्रिया करण्याचे काम मनपाने २००० मध्ये नाशिकच्या वॉटरग्रेस कंपनीला दिले होते. कंपनीच्या कराराची मुदत २०२२ मध्ये संपली. मनपाने कंपनीला मुदतवाढ न देता निविदा प्रक्रिया केली. त्यात गोवा येथील बायोटेक कंपनी सर्वोत्कृष्ट ठरली. मनपाने कंपनीला काम सुरू करण्याचे निर्देशही दिले.

दोन दिवसांपूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी महापालिका प्रशासकांच्या नावे पत्र पाठवून वैद्यकीय कचरा प्रकल्प वॉटरग्रेस कंपनीच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले.

कायदेशीर सल्ला घेणारपत्राच्या अनुषंगाने महापालिका सर्व कायदेशीर बाबी तपासून व कायदेशीर सल्लागाराचे मत लक्षात घेऊन उत्तर देणार आहे. अध्यक्षांनी आपल्या पत्राचा फेरविचार करावा, अशी विनंती करण्यात येईल.जी. श्रीकांत (प्रशासक, महापालिका)

मनपाने करारच रद्द केला...१) वॉटरग्रेस कंपनीसोबत केलेला करारच रद्द केला आहे. करारच रद्द झालेला असल्यामुळे आता कोणतीही वैधता राहत नाही.२) वॉटरग्रेस कंपनी महापालिकेच्या अखत्यारीत एक व्हेंडर म्हणून काम करीत होती. कंपनीची व्हेंडरशिप रद्द झाली आहे.३) कंपनीने केलेले एमओयु ग्राह्य धरता येणार नाहीत, असे मनपातील सूत्रांनी नमूद केले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न