शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

२९१ ग्रामपंचायत सदस्यांचे पद धोक्यात

By admin | Published: March 20, 2016 1:09 AM

हिंगोली : ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांना सहा महिने उलटले तरीही अनेकांनी अद्याप निवडणूक खर्च दाखल केला नाही.

हिंगोली : ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांना सहा महिने उलटले तरीही अनेकांनी अद्याप निवडणूक खर्च दाखल केला नाही. त्यामुळे अशा ३८८ पैकी २९१ जणांना अनर्हतेची नोटीस देवून पुढील पाच वर्षांसाठी सदस्य राहण्यास किंवा निवडणूक लढविण्यास अपात्र का ठरविण्यात येवू नये, अशा नोटिसा बजावण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.ग्रामपंचायत निवडणुकीतील अनेक सदस्यांनी वेळेत खर्च दाखल केला नाही. निवडणूक कार्यक्रम सुरू झाल्यापासून तीस दिवसांच्या आत हा खर्च दाखल करण्याचा निवडणूक आयोगाचा नियम आहे. मात्र तसे न करणाऱ्या ३८८ जणांना यापूर्वी नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर त्यापैकी ३ मयत, ७ जणांनी खर्च सादर केल्याचे तर ८७ जणांनी विलंबाने खर्च दाखल केल्याचे आढळून आले. त्यामुळे हे सदस्य वगळून उर्वरित २९१ जणांना नोटिसा बजावून खुलासा सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. या २९१ जणांचे पद गेल्यातच जमा आहे. मात्र त्यांना नोटिसीत पंधरा दिवसांची मुदत देवून पुढील पाच वर्षांसाठी सदस्य म्हणून राहण्यास किंवा सदस्य होण्यास निवडणूक लढविण्यासाठी अनर्ह का ठरविण्यात येवू नये, असा इशारा दिला. तर जिल्हाधिकारी कार्यालयात हा खुलासा समक्ष सादर न केल्यास आपले काहीही म्हणने नाही, असे समजून कार्यवाही करण्यात येईल, असेही नोटिसीत म्हटले आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटिसीनंतर तरी ही मंडळी खुलासा सादर करेल की नाही, याची शंकाच आहे. अशा प्रकरणांत कदाचित संयुक्तिक खुलासा आल्यास जिल्हाधिकारी विचार करतील वा नाही, हे सांगणे अवघड आहे. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने सदस्य अनर्ह झाल्यास पुन्हा निवडणुका घेण्याची वेळ येणार आहे. निवडणूक खर्च सादर न केल्याने पुन्हा निवडणुकीवर लाखोंचा खर्च करावा लागणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)