शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

वंचित आघाडीकडून 'आरक्षण बचाव जनयात्रे'ची घोषणा; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम, या आहेत प्रमुख मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 6:44 PM

"आम्ही पक्षाच्या वतीने, या सामाजिक संघटनांना घेऊन २५ तारखेला दादर चैत्यभूमि येथून सुरूवात करायची. त्याच दिवशी पुण्यात फुलेवाड्याला जायचे आणि २६ तारखेला सकाळी, २६ जूलै एक महत्वाची तारीख आहे. याच दिवशी शाहू माहाराजांनी आरक्षणाची घोषणा केली होती. तेव्हा शाहू महाराजांना नतमस्तक होऊन 'आरक्षण बचाव जनयात्रा' काढण्याचा निर्णय घेतला आहे."

वचित बहुजन आघाडी जी भूमिका मांडत आहे ती, गावो गावी जायला हवी, अशी काही ओबीसी संघटनांची मागणी होती. त्यामुळे आम्ही पक्षाच्या वतीने, या सामाजिक संघटनांना घेऊन २५ तारखेला दादर चैत्यभूमि येथून सुरूवात करायची. त्याच दिवशी पुण्यात फुलेवाड्याला जायचे आणि २६ तारखेला सकाळी, २६ जूलै एक महत्वाची तारीख आहे. याच दिवशी शाहू माहाराजांनी आरक्षणाची घोषणा केली होती. तेव्हा शाहू महाराजांना नतमस्तक होऊन 'आरक्षण बचाव जनयात्रा' काढण्याचा निर्णय घेतला आहे. ही यात्रा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, जालना अशी होत सांगता सात अथवा आठ तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये होईल, अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांसोबत बोलत होते. 

अशा आहेत मुख्य मागण्या -आंबेडकर म्हणाले, "या मार्गावर ठीक-ठिकाणी कॉर्नर बैठका घेतल्या जातील आणि मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या जातील. यातील मुख्य मागण्या म्हणजे, ओबीसींचे आरक्षण वाचायला हवे, एससी-एसटी विद्यार्थांची स्कॉलरशिप दुप्पट व्हावी, केवळ केंद्राचीच स्कॉलरशिप मिळते इतर राज्यांप्रमाणे त्यात राज्य हिस्सा देत नाही. याच बरोबर, ओबीसींच्या विद्यार्थ्यांनादेखील एससी एसटीला जी स्कॉलरशिप मिळते ती जशीच्या तशी लागू व्हायरला हवी, घाई गडबडीत इश्यू करण्यात आलेला फॉर्म ऑफ कास्ट सर्टेफिकेट रद्द करावा, जे कुणबी  आहेत, त्यांना आरक्षण मिळणारच, कारण ते ओबीसीमध्ये सामील आहे. तसेच, आरक्षणात एससी, एसटी बरोबरच ओबीसींनादेखील बदोन्नती मिळायला हवी," असेही आंबेडकर म्हणाले.

राजकीय पक्षांच्या भूमिकेसंदर्भात बोलताना आंबेडकर म्हणाले, "एकीकडे मनोज जरांगे यांनी आपले आंदोलन सुरू केले आहे, तर दुसऱ्याबाजूला जी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्या बैठकीला सर्व मराठा नेते, एनसीपीचे, काँग्रेसचे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातील कुणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे त्या बैठकीत राजकीय पक्षांनी नेमकी भूमिका काय? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीकडून विचारण्यात आला. यावर सामंजस्याचा तोडगा काढायचा असेल, तर येथील श्रीमंत माराठ्यांचे पक्ष जे आहेत, यात एनसीपी, काँग्रेस, बाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, हे जोवर भूमिका मांडत नाहीत. तोवर तोडगा निघत नाही."

"दुसऱ्या बाजूला त्याच बैटकीत वंचितकडून मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली होती की, मुख्यमंत्र्यांनी या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना व्यक्तिगत आणि मुख्यमंत्री म्हणूनही पत्र लिहावे की, जरांगे यांची मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या, ही जी मागणी आहे, या संदर्भात राजकीय पक्षांची भूमिका काय आहे? यासंदर्भात विचारणा करून मग समान तोडगा काय आहे तो काढता येतील. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र वंचितला अद्याप तेस काहीही पत्र मिळाले नाही. इतरांना मिळाले का यासंदर्भात आमच्याकडे माहिती नाही. हा मुद्दा आता केवळ मराठवाड्यापुरताच आहे, असे मी मानत नाही. तर तो पश्चिम महाराष्ट्र आणि खांदेशातही हळू-हळू पसरत चालला आहे," असेही आंबेडकर म्हणाले.  

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षण