शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

औरंगाबादेत उत्पादन घटल्याने तिळाचे भाव वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 11:59 AM

बाजारगप्पा : पुढील महिन्यात संक्रांत सण असल्याने आणखी भाव वाढतील

- प्रशांत तेलवाडकर (औरंगाबाद )

देशात उत्पादन घटल्याच्या बातमीमुळे तिळाचे भाव वधारले आहेत. विशेष म्हणजे पुढील महिन्यात संक्रांत सण असल्याने आणखी भाव वाढतील यामुळे व्यापाऱ्यांनी तिळाचा साठा करून ठेवणे सुरू केले आहे. मागील महिनाअखेरीचा आठवडा होता. यामुळे बाजारपेठेतील उलाढाल थंडावली होती. जाधववाडीतील अडत बाजार व मोंढ्यातील धान्याच्या होलसेल बाजारात वर्दळ कमालीची घटली होती; मात्र शनिवार, १ डिसेंबरपासून किराणा दुकानात महिन्याचे सामान भरणाऱ्या ग्राहकांची गर्दी पाहण्यास मिळाली.

रविवारीही गर्दी कायम होती. अनेक किराणा दुकानांत ग्राहकांनी सामानाच्या याद्या आणून दिल्या आहेत. तिळाची वर्षभरातील एकूण विक्रीपैकी ६० टक्के विक्री संक्रांतीला होत असते. यंदा महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात या तीळ उत्पादक राज्यांत तिळाचे उत्पादन कमी आहे. मध्यप्रदेशात समाधानकारक उत्पादन असल्याचे सांगितले जाते. नवीन तिळाची बाजारात आवक सुरू झाली आहे. उत्पादन कमी असल्याने तिळाचे भाव मागील वर्षीच्या तुलनेत वधारले आहेत. मागील संक्रांतीदरम्यान १०० रुपये किलोने तीळ विक्री झाली होती.

यंदा डिसेंबर महिन्यातच नवीन तिळाचे भाव १६० ते १७० रुपये प्रतिकिलोपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत सध्या तीळ किलोमागे चक्क ६० ते ७० रुपयांपर्यंत महागली आहे. यात आणखी भाववाढ होण्याची शक्यता लक्षात घेता किराणा व्यापाऱ्यांनी आधीच दुकानात मुबलक साठा करून ठेवणे सुरू केले आहे. म्हणून मागील आठवड्यात तिळाची विक्री वाढली होती. देशांतर्गत बाजारातील साखरेच्या पुरवठ्यावर नियंत्रण राहावे, यासाठी केंद्र सरकारने पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे महिन्याचा साखर कोटा जाहीर करणे सुरू केले आहे. यामुळे साखर कारखान्यांना साखर विक्रीला मर्यादा घालून दिल्या आहेत.

राज्यातील साखर कारखान्यांचे लक्ष डिसेंबरच्या साखर कोट्याकडे लागले होते. कारण, साखर कोटा कमी-जास्त जाहीर झाला तर त्यानुसार बाजारात त्वरित भावात तेजी-मंदी येते. डिसेंबर महिन्यासाठी १९.५० लाख मेट्रिक टन साखर कोटा केंद्र सरकारने जाहीर केल्याची बातमी शनिवारी बाजारपेठेत पसरली. मागणीच्या तुलनेत साखर कोटा कमी असल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले; मात्र रविवारी सुटीचा दिवस असल्याने साखरेच्या भावावर त्वरित परिणाम दिसून आला नाही. साखर एस (बारीक) ३१०० रुपये, सुपर एस (मध्यम) ३२०० रुपये, तर एम (जाड) ३२५० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली.

साखर भावातील तेजी-मंदी  टेंडर निघाल्यावर लक्षात घेईल, असे व्यापाऱ्यांनी नमूद केले.सर्वसामान्य ग्राहकांचे गहू, ज्वारी, बाजरी व डाळींच्या भावावर अधिक लक्ष असते; मात्र यात मागील महिनाभरात मोठी तेजी झाली. यामुळे ग्राहकांनी खरेदीतून हात आखडता घेतला. परिणामी मागील दोन आठवड्यांपासून भाव स्थिर आहेत, तसेच तांदळाचेही भाव स्थिर होते. आता नवीन तांदळाची आवक सुरू आहे.