शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

२० वर्षांपासून रखडलेला प्रकल्प मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 21:58 IST

पैठण येथे संतपीठ स्थापन करण्याचा निर्णय ४ नोव्हेंबर १९९८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी घेऊन उद्घाटन केले. या उद्घाटनानंतर १३ फेब्रुवारी २०१४ रोजी संतपीठासाठी आवश्यक असलेल्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन उद्घाटन झाले. मात्र तरीही त्या ठिकाणी संतपीठ सुरू झाले नाही. मात्र येत्या दोन महिन्यांत सर्व प्रकारच्या मान्यता होऊन हा प्रकल्प मार्गी लागणार असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. अशोक तेजनकर व संजय जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देसंतपीठ : नोडल अधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती

औरंगाबाद : पैठण येथे संतपीठ स्थापन करण्याचा निर्णय ४ नोव्हेंबर १९९८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी घेऊन उद्घाटन केले. या उद्घाटनानंतर १३ फेब्रुवारी २०१४ रोजी संतपीठासाठी आवश्यक असलेल्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन उद्घाटन झाले. मात्र तरीही त्या ठिकाणी संतपीठ सुरू झाले नाही. मात्र येत्या दोन महिन्यांत सर्व प्रकारच्या मान्यता होऊन हा प्रकल्प मार्गी लागणार असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. अशोक तेजनकर व संजय जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.पैठण येथील संतपीठात सुरू करण्यात येणाºया अभ्यासक्रमांचा अहवाल नुकताच संतपीठाचे नोडल अधिकारी तथा विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, संजय जोशी यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे सुपूर्द केला. मुंबईत आयोजित संत परिषदेला उपस्थितीत संत-महंतांच्या हजेरीत हा प्रस्ताव सादर केला असल्याचे संजय जोशी यांनी सांगितले. पैठण येथे उभारलेल्या संतपीठाच्या इमारतीमध्ये ५० वर्गखोल्या आहेत. याच इमारतीत ३ सभागृह असून, प्रशासकीय इमारतीमध्ये संतपीठाचे कामकाज व्यवस्थितपणे सुरू होईल, एवढ्या पायाभूत सुविधा आहेत. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी १०० विद्यार्थी क्षमतेचे दोन वसतिगृह उपलब्ध आहेत. याठिकाणी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाºयांच्या मान्यतेचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यात येणार आहे. यामुळे येत्या जून महिन्यापासून संतपीठ सुरू होणार असल्याचेही डॉ. तेजनकर आणि जोशी यांनी स्पष्ट केले. यावेळी मराठी विभागप्रमुख डॉ. अशोक देशमाने, डॉ. दासू वैद्य उपस्थित होते.पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमसंतपीठामध्ये तीन विषयांत पदविका अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. यात तबला, पखवाजवादन, संवादिनी गायन, सांप्रदायिक गायन, संस्कृत, गीता अभ्यासाचा समावेश असेल. पदवी अभ्यासक्रमातही विविध विषयांचा समावेश असणार आहे. तर पदवीच्या ऐच्छिक विषयात इतिहास, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयांचा समावेश असेल, अशी माहिती डॉ. अशोक तेजनकर यांनी दिली.

टॅग्स :universityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबाद