शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

जिल्ह्यात केंद्रवाढीचा प्रस्ताव आयोगाकडे

By admin | Published: September 23, 2014 1:24 AM

औरंगाबाद : नवीन मतदारांची संख्या वाढल्यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्याही वाढणार आहे. जिल्ह्यातील ११७ मतदान केंद्रे वाढविण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे

औरंगाबाद : नवीन मतदारांची संख्या वाढल्यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्याही वाढणार आहे. जिल्ह्यातील ११७ मतदान केंद्रे वाढविण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी दिली.लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यातील मतदारांची संख्या २३ लाख इतकी होती, लोकसभा निवडणुकीनंतर आयोगाने सातत्याने मतदार नोंदणी मोहीम राबविली. त्यामुळे आता जिल्ह्यातील मतदारांची संख्या २४ लाख ४४ हजार इतकी झाली आहे. मतदारांची संख्या वाढल्यामुळे जिल्ह्यात मतदान केंद्रांची संख्याही वाढवावी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व मतदान केंद्रांवरील मतदारांची संख्या लक्षात घेऊन ११७ नवीन मतदान केंद्रे निर्माण करण्याचा प्रस्ताव आयोगाकडे सादर केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या २७४७ वर पोहोचणार आहे. नवीन मतदान केंद्रांपैकी सर्वाधिक ३७ केंदे्र औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात आणि ३५ मतदान केंदे्र औरंगाबाद मध्य मतदारसंघात प्रस्तावित करण्यात आली आहेत.औरंगाबाद पूर्व मतदारसंघातही ११ नवीन मतदान केंदे्र प्रस्तावित करण्यात आली आहेत. तसेच गंगापूर मतदारसंघात १६, वैजापूर मतदारसंघात ३, पैठण मतदारसंघात ८, सिल्लोड मतदारसंघात ४, कन्नड मतदारसंघात २ आणि फुलंब्री मतदारसंघात १ नवीन मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने काही मतदान केंद्रांच्या जागांमध्ये बदल प्रस्तावित केले आहेत. जिल्ह्यातील १८४ मतदान केंद्रांच्या बाबतीत असे बदल सुचविले आहेत. मतदारांना अधिक सोयिस्कर ठरण्याच्या दृष्टीने हे बदल सुचविले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वाधिक ६७ केंद्रांचे बदल औरंगाबाद मध्य मतदारसंघात सुचविण्यात आले आहेत. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातही ५१ मतदान केंद्रांमध्ये बदल सुचविण्यात आले आहेत.