शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
3
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
4
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
5
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
6
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
7
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
8
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
9
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
10
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
11
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
12
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
13
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
15
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
16
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
17
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
18
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
19
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
20
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर

प्रोटोकॉल, नव्या योजनांमुळे ‘प्रशासकीय’ यंत्रणेचा धुरळा! कलेक्टर, सीईओ २४ तास व्हीसीमध्ये

By विकास राऊत | Published: August 26, 2024 8:25 PM

निवडणुकीच्या तोंडावर शासकीय योजनांच्या घोषणा आणि अंमलबजावणीचा भडिमार सध्या सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वांना लागले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर शासकीय योजनांच्या घोषणा आणि अंमलबजावणीचा भडिमार सध्या सुरू आहे. रोज व्हिडीओ कॉन्फरन्स, बैठका, मंत्र्यांच्या दौऱ्यांमुळे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जि. प. सीईओ, पोलिस यंत्रणेला फिल्डवर जाण्यास वेळ मिळत नाही, तसेच सामान्य नागरिकांच्या समस्या ऐकण्यासही वेळ देता येत नाही. २४ तास प्रोटोकॉलमुळे प्रशासकीय यंत्रणेचा पुरता धुरळा उडतो आहे. जनसामान्यांचे म्हणणे ऐकण्यास प्रशासनाला वेळ नाही, पावसाळ्यातील फिल्ड व्हिजीट बंद आहेत. योजनांची अंमलबजावणी आणि व्हीसी पुरतीच प्रशासकीय यंत्रणा सध्या उरली आहे.

जिल्ह्यातील मंत्री आठवड्यातील दोन दिवस येथेच असतात. ‘महसूल’च्या अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल नियम ८ नुसार प्रत्येक दौऱ्याच्या वेळी कार्यक्रमास्थळी किंवा विमानतळ, रेल्वे स्टेशन व इतर ठिकाणी हजर राहायचं म्हटल्यास त्यांनी ऑफिसला कधी थांबायचे, सर्वसामान्य जनतेची कामे कशी करायची, असा प्रश्न आता पुढे आला आहे. दिवस-दिवस सनदी अधिकारी व्हीसीमध्ये गुंतलेले असतात. तीन महिन्यांत ११७ व्हीसी झाल्या आहेत. विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी शासनाला सगळे प्रकल्प, संचिका, योजनांतून जनमत साध्य करण्याची घाई आहे. २० सप्टेंबरची त्यासाठी डेडलाइन ठरली आहे.

योजनांचा ताण, यंत्रणा हैराणमहसूलसह सगळ्या विभागांची यंत्रणा योजनांच्या लक्ष्यपूर्तीसाठी जुंपली आहे. योजना अंमलबजावणीचा ताण असल्यामुळे सगळे कर्मचारी हैराण झाले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या अंमलासाठी सगळे प्रशासन रस्त्यावर आहे.

आचारसंहिता लवकर लागावीविधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागते, याकडे प्रशासनाचे लक्ष आहे. व्हीसी, बैठका, योजनांचा अंमल, प्रोटोकॉल या सगळ्यामुळे सगळी यंत्रणा मेटाकुटीस आली आहे. नावीन्यपूर्ण योजनांबाबत विचार करण्यास प्रशासनाकडे वेळ उरलेला नाही. अधिकारी भेटत नाहीत म्हणून सामान्य आगपाखड करून जिल्हाधिकारी, जि. प. व इतर शासकीय कार्यालये सोडतात.

राजकीय खेचाखेचीत प्रशासनवेगवेगळे पक्ष व गटांमध्ये वर्षभरापासून बैठका, मेळावे सुरू आहेत. त्यामुळे प्रत्येक व्हीआयपीला सोबत ताफा फिरवून ताकद दाखविण्याची सवय लागली आहे. शासकीय यंत्रणेचा असा वापर होणे योग्य आहे काय, असा सवालही अधिकारी खासगीत करतात. अधिकारी प्रोटोकॉलच्या नावाखाली व्हीआयपींसोबत जात असल्याने सुनावणी व इतर कामांसह नागरिकांना ताटकळावे लागते.

पोलिस यंत्रणेवर सर्वाधिक ताणमुख्यमंत्री लोकसभा निवडणुकीपासून सात वेळा आले. राज्यातील व केंद्रीय मंत्र्यांचे दौरे सुरूच आहेत. २५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी काही क्षणासाठी विमानतळावर थांबले. पुढच्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्री शहरात येणार आहेत. पोलिस यंत्रणेवर सर्वाधिक ताण वाढला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद