शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

पाऊस लांबला; मराठवाड्यावर दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 11:56 IST

Rain Delay in Marathwada : शेतकऱ्यांनी विभागीय प्रशासनातील वरिष्ठांची भेट घेऊन पेरणी आणि पाऊस याबाबत चिंता व्यक्त केली.

ठळक मुद्देमराठवाड्यात ६५ टक्के पेरण्या पूर्णशेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

औरंगाबाद : मराठवाड्यावर दुबार पेरणीचे संकट घोंगावू लागले आहे. जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतातूर असून, येणाऱ्या आठवड्यात पावसाचे आगमन न झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. ( Crisis of double sowing in Marathwada) 

औरंगाबाद जिल्ह्यात ६३ टक्के, जालन्यात ७६ टक्के, बीड जिल्ह्यात ८६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. लातूर जिल्ह्यात ५९ टक्के, उस्मानाबाद ६२ टक्के, नांदेड ७६ टक्के, परभणी ६३ टक्के, हिंगोलीत ७१ टक्के पेरण्या आजवर झाल्या आहेत. ६५ टक्क्यांच्या आसपास मराठवाड्यात पेरण्या झाल्याची प्राथमिक आकडेवारी सांगते.

सोमवारी शेतकऱ्यांनी विभागीय प्रशासनातील वरिष्ठांची भेट घेऊन पेरणी आणि पाऊस याबाबत चिंता व्यक्त केली. सध्या पावसाचा खंड असला तरी जुलै महिन्यात पावसाचा चांगला अंदाज हवामान खात्याने वर्तविलेला आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली नाही तर विभागातील परिस्थिती पाहता दुबार पेरणी करावी लागेल, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

यंदाच्या जूनमध्ये २०० मि. मी. पाऊसयंदाच्या पावसाळ्यात जून महिन्यात मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. विभागात यंदाच्या जून महिन्यात फक्त आठ दिवस पाऊस झाला आहे. २०० मिलिमीटर पावसाची नोंद विभागात नोंदविली गेली असली तरी अनेक जिल्ह्यांत जून महिन्याची सरासरीदेखील पूर्ण झालेली नाही.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीagricultureशेती