शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

राजकारणात नव्याने सुरुवात करणाऱ्या राज ठाकरेंच्या विलीनीकरणावरील मताला महत्व देत नाही : गुणरत्न सदावर्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 5:39 PM

Adv. Gunaratna Sadavarte : विलीनीकरणाच्या लढ्यात आम्हाला अनेक अनुभवी लोकांनी पाठिंबा दिला आहे, राज ठाकरेंच्या मताला महत्व देत नाही.

औरंगाबाद : एसटी विलीनीकरणाच्या लढ्यात अनेक अनुभवी लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. यामुळे राजकारणात नव्याने सुरुवात करणाऱ्या राज ठाकरे ( Raj Thackarey ) यांनी एसटीचे विलानीकरण ( ST Strike ) होणार नाही असे वक्तव्य केले आहे, या त्यांच्या खाजगी मताला मी जास्त महत्व देत नाही, असा खोचक टोला अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते ( Adv Gunaratna Sadavarte ) यांनी लगावला. अ‍ॅड. सदावर्ते यांनी आज औरंगाबाद येथील संपकरी एसटी कर्मचाऱ्याची भेट घेतली. 

राज्य शासनात एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी मागील महिनाभरापासून संप पुकारला आहे. सोमवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी १३ डिसेंबर हि कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याची डेडलाईन दिली होती. मात्र, संप अजूनही सुरुच असून सर्व कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, आज अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातील संपकरी कर्मचाऱ्यांची आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास भेट घेतली. यावेळी त्यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण होणार असून आम्ही जिंकणार आहोत. आमच्यासोबत संविधान आहे, अशी ग्वाही दिली.

राज ठाकरेंची राजकारणात नव्याने सुरुवात तसेच यावेळी अ‍ॅड. सदावर्ते यांनी राज ठाकरे यांनी एसटीचे विलीनीकरण होऊ शकत नाही या वक्तव्याचा समाचार घेतला. विलीनीकरणाच्या लढ्यात आम्हाला अनेक अनुभवी लोकांनी पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांच्या राजकारणाची नव्याने सुरुवात झाली असून त्यांच्या खाजगी मताला मी महत्व देत नाही, अशी खोचक टीका अ‍ॅड. सदावर्ते यांनी केली.

विलीनीकरण घेऊनच राहणार सगळा पिटारा मी उघडणार नाही, २० डिसेंबरला सरकारने पूर्ण तयारीनिशी यावे. आम्ही विलनिकरण घेऊनच राहणार. नसता शाळकरी मुलांपासून ते दूध वाटप करणाऱ्यांपर्यंत सर्वांना सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या रोषाला या सरकार ला सामोरे जावे लागेल, असा इशाराही यावेळी अ‍ॅड. सदावर्ते यांनी दिला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेST Strikeएसटी संपAurangabadऔरंगाबाद