शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

‘राज्यराणी’ एक्स्प्रेसमुळे मुंबई प्रवास होणार आणखी सुखद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 19:32 IST

जनशताब्दी, तपोवन, नंदिग्राम, देवगिरीसह आणखी एक रेल्वे

ठळक मुद्देरेल्वेमंत्र्यांकडून हिरवा कंदिल 

औरंगाबाद : मुंबई- मनमाड राज्यराणी एक्स्प्रेसला नांदेडपर्यंत नेण्यास अखेर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी हिरवा कंदिल दिला आहे. मुंबईसाठी नव्या रेल्वेची मागणी लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. त्यामुळे शहराची मुंबई कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.  

औरंगाबादहून मुंबईसाठी आजघडीला जनशताब्दी, तपोवन, नंदिग्राम, देवगिरी एक्स्प्रेसशिवाय अन्य रेल्वे नाही. शहरातून मुंबईला दररोज दोन ते तीन हजारांवर प्रवासी ये-जा करतात. प्रवाशांची संख्या पाहता या शहरासाठी नव्या रेल्वेची मागणी होत आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्यानंतर नांदेड ते मुंबईसाठी लवकरच नवीन रेल्वे मिळणार असल्याची घोषणा नांदेड विभागाने केली होती; परंतु एक-एक महिना उलटत आहे, तरीही मुंबईसाठी नवीन रेल्वे मिळत नाही. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. 

औरंगाबाद रेल्वेस्टेशनच्या पाहणी दौऱ्यात १२ डिसेंबर २०१८ रोजी ‘दमरे’चे तत्कालीन महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेसला ८ बोगी जोडून नांदेड-मुंबई रेल्वेचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात वर्ष उलटूनही औरंगाबादहून मुंबईसाठी नवीन रेल्वे सुरू होऊ शकली नाही. औरंगाबादकरांचा मुंबईचा प्रवास खचाखच गर्दीतून आणि वेटिंगवरच होतो. नव्या रेल्वेची महिनोन्महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार करणे, नांदेड-मुंबईसाठी नवीन रेल्वे सुरू करणे, हा रेल्वे बोर्डाचा धोरणात्मक निर्णय आहे, असे म्हणत मध्य रेल्वेने वारंवार रेल्वे बोर्डाकडेच बोट दाखविले. या रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी लोकप्रतिनिधी, रेल्वे संघटनांकडून सतत पाठपुरावा करण्यात आला. अखेर रेल्वेमंत्र्यांनी या रेल्वेच्या विस्तारीकरणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच ही रेल्वे नांदेडहून धावेल.

नव्या वर्षाचा मुहूर्तराज्यराणी एक्स्प्रेस नांदेडहून सुरू करण्यासाठी नव्या वर्षाचा मुहूर्त साधला जाणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, ही रेल्वे नांदेडहून कधी सुरू होणार, याबाबत अद्याप काही माहिती प्राप्त झालेली नाही, असे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या जनसंपर्क विभागातर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनNandedनांदेड