शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आयुष्याची दोरी घट्ट करणाऱ्या डाॅक्टरला बांधली राखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 15:08 IST

रहेमानिया काॅलनीतील रहिवासी समिना पठाण यांची ८ ऑगस्ट रोजी घाटीत शस्त्रक्रिया करून एक किडनी काढण्यात आली.

ठळक मुद्देशस्त्रक्रिया करून रक्षण केल्याची महिला रुग्णाची भावनाघाटी रुग्णालयातील भावनिक क्षण 

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : स्थळ, घाटी रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक २०, वेळ रविवार दुपारी २ वाजेची. एक डाॅक्टर वाॅर्डातील महिला रुग्णाजवळ जाताच तिच्या अश्रूंचा बांध फुटतो. किडनीची यशस्वी शस्त्रक्रिया करून आयुष्याची दोरी घट्ट करणाऱ्या या डाॅक्टरलाच भाऊ मानत आयुष्यात पहिल्यांदाच तिने राखी बांधली. तिचे नाव समिना पठाण आणि हा भाऊ म्हणजे डाॅ. सुरजित दास.

रहेमानिया काॅलनीतील रहिवासी समिना पठाण यांची ८ ऑगस्ट रोजी घाटीत शस्त्रक्रिया करून एक किडनी काढण्यात आली. किडनीच्या आजूबाजूला पस (पू) झाल्याने ही शस्त्रक्रिया करण्याची वेळ त्यांच्यावर ओढावली. किडनी काढावी लागणार, हे जेव्हा समिना यांना कळले तेव्हा त्या प्रचंड घाबरून गेल्या. त्या शस्त्रक्रियेला सहजासहजी तयार होत नव्हत्या. शस्त्रक्रियेचा दिवस उजाडला. तरीही भीती त्यांच्या मनातून गेली नव्हती. तेव्हा डाॅ. सुरजित दास यांनी समिना यांना धीर दिला. ‘तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत. मला तुमचा भाऊ समजा, मी सर्व काळजी घेईल, घाबरू नका’ असे म्हणत त्यांना शस्त्रक्रियागृहात नेले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि आज त्या वॉर्डात दाखल आहेत. दोन दिवसांत त्यांना सुटी देण्यात येणार आहे.

वाॅर्डातील बाजूच्या खाटेवरील रुग्णाचे नातेवाईक शनिवारी राखीपौर्णिमेविषयी बोलत होते. तेव्हा समिना पठाण यांनी आपल्यालाही एक राखी आणून देण्याची विनंती त्यांना केली. त्यांनी समिना यांना राखी आणून दिली. राखी बांधण्यासाठी समिना या रविवारी सकाळपासूनच डाॅ. दास यांची वाट पाहत होत्या. डाॅक्टर भाऊराया ऑनलाइन परीक्षेत होते. अखेर दुपारी डाॅ. दास वॉर्डात आले. तेव्हा अनावर झालेल्या भावनांना वाट करून देत समिना यांनी डाॅ. दास यांना राखी बांधली. यावेळी दोघेही क्षणभर भावुक झाले होते. हा प्रसंग पाहताना वाॅर्डातील इतरांचेही डोळे पाणावले. डाॅ. मयूर दळवी, डाॅ. अनिता कंडी, डाॅ. मुब्बशीर काझी, डाॅ. सुरेश हरबडे यांच्यासह परिचारिका, कर्मचाऱ्यांनी शस्त्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

भावना अनावरडाॅ. सुरजित दास हे त्रिपुरा येथील रहिवासी आहे. गेल्या तीन वर्षांपासून पदव्युत्तर शिक्षणासाठी घाटी रुग्णालयात आहेत. मला दोन बहिणी आहेत. त्यांची भेट वर्षातून एकदा होते. आज रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला आणखी एक बहिणी मिळाली, हे सांगताना डाॅ. दास यांना भावनाविवश झाले होते.

टॅग्स :RakhiराखीAurangabadऔरंगाबाद