शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

खऱ्या अराजकाला लोकसभेनंतर सुरुवात होणार, मोदींनंतर भाजप खिळखिळ होईल- कुमार केतकर

By राम शिनगारे | Updated: October 13, 2023 22:22 IST

एमजीएम वृत्तपत्र व जनसंवाद महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद

छत्रपती संभाजीनगर : सध्या देशात जो काही प्रकार सुरु आहे. ती केवळ लिटमस टेस्ट आहे. खऱ्या अराजकतेला लोकसभा निवडणूकीनंतर २०२४ साली सुरू होणार आहे. ती अराजकता किती हिंसात्मक असेल हे आताच सांगता येणार नाही, असे भाकितच राज्यसभेतील खासदार तथा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी वर्तविले.

एमजीएममधील वृत्तपत्र व जनसंवाद महाविद्यालयात विद्यार्थ्यांसोबत खा. कुमार केतकर यांची खुली चर्चा शुक्रवारी सायंकाळी आयोजित केली होती. यावेळी विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, सामाजिक कार्यकर्ते प्रा. एच.एम. देसरडा, अण्णासाहेब खंदारे, डॉ. स्मिता अवचार, प्राचार्य डॉ. रेखा शेळके आदींची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांसह सामाजिक चळवळी काम करणाऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. ते म्हणाले, सध्या सुरु असलेल्या इस्त्राईल व पेलेस्टाईन प्रकरणात हमास, तालिबान, आयएसआयसारख्या सगळ्या संस्था एकच आहेत. त्यांना ठेचलेच पाहिजे, अशी भाषा केली जात आहे. केंद्र शासनाला कशाही पद्धतीने पुन्हा सत्तेत यायचे आहे.

त्यासाठी ते कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. लोकसभा जिंकण्यासाठी हे सरकार बालाकोट, पुलवामा सारखे छोटेखानी युद्धही देशावर लादू शकते. सध्याचा प्रकार हा केवळ अधिकाधिक आरजकाची पूर्वतयारी असल्याचा दावाही त्यांनी केला. सध्या जागातील फक्त तीनच देशात ईव्हीएम मशीनवर मतदान होते. त्यात भारताचा समावेश आहे. जेव्हा ईव्हीएम सुरू झाले तेव्हाचे तंत्रज्ञान आणि आताचे तंत्रज्ञान जमीन असमानचा फरक आहे. सध्या भाजपला ५४५ जागांवर ईव्हीएम मॅनेज करावे लागणार नाही. त्यांना सत्तेत येण्यापुरत्या जागा हव्या आहेत. त्यासाठी ते वेगवेगळ्या माध्यमातुन ईव्हीएम मॅनेज करतील असेही खा. केतकर यांनी सांगितले.

मोदींनंतर भाजपा खिळखिळ होईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतरची भाजपा खिळखिळ होईल असा दावा करताना आरएसएस नावाची संघटना बलाढ्य असल्याचे सांगितले जाते. मात्र, तसे काही नाही. या संघटनेची स्थापना १९२५ साली झाली. मात्र, या संघटनेच्या माध्यमातुन जनसंघाच्या काळापर्यंत एकाही राज्यात सत्ता स्थापन करता आलेली नसल्याचेही त्यांनी सांगितले. ज्याठिकाणी सत्ता मिळवली ती इतर पक्षांच्या मदतीनेच मिळवल्याचेही केतकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद