शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बदलीसाठी दिलेल्या पैशांची तलाठ्यांकडून वसुली; फेरफार अडवून ठेवत घेतली लाच 

By विकास राऊत | Updated: September 28, 2024 18:39 IST

लाचखोरीच्या सापळ्यात अडकला तलाठी

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा प्रशासनाने गेल्या महिन्यात केलेल्या तलाठी बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अर्थकारण झाले. दरम्यान, बदलीसाठी दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी तलाठ्यांनी आता सामान्यांच्या खिशात हात घालण्यास सुरुवात केली आहे. फेरफार अडवून ठेवत लाखो रुपयांची मागणी केल्यामुळे सातारा-देवळाईचे तलाठी दिलीप जाधव याला लाच घेताना एसीबी पथकाने पकडले. यातून तलाठी बदल्यांसाठी झालेला लिलाव स्पष्ट होत आहे.

‘पैसे कमवायचे असतील, तर पैसे द्यावेच लागतील’, या वृत्तीने तलाठी बदलीत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली. ती रक्कम वसूल करण्यासाठी काही तलाठी सरसावल्याचे दिसत आहेत. बदलीनंतर तलाठ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये उफाळून आलेला वाद ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला होता.

बदल्यानंतर तलाठ्यांच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये मर्जीतील ठिकाण मिळण्यासाठी ३ ते १२ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मोजल्याची चर्चा होती. ही रक्कम कुणी-कुणाला दिली आणि कुणी-कुणाकडून घेतली, यावरून बदल्यांच्या प्रक्रियेत असलेले वरिष्ठ अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले. शासनाने बदल्यांसाठी घालून दिलेल्या निकषाची पायमल्ली झाली. याप्रकरणात चौकशी सुरू असून अहवाल आल्यानंतरच किती आर्थिक उलाढाल, हे समोर येईल.

महिनाभरातच ती भीती ठरली खरीमर्जीतील सज्जा मिळण्यासाठी ३ ते १२ लाख एवढी रक्कम देणाऱ्या तलाठ्यांनी ती पगारातून दिली असेल का? उदाहरण म्हणून एका सज्जा-मंडळसाठी तीन वर्षांसाठी १२ लाख दिले. म्हणजे वर्षाला ४ लाख याप्रमाणे महिना ३० ते ३५ हजार वरकमाई करावीच लागणार, हे स्पष्ट आहे. हे ३० ते ३५ हजार सामान्य लोकांच्या खिशातूनच घेतले जाणार, हे निश्चित आहे. या चक्रव्यूहात तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकून बदनाम होईल, अशी भीती तलाठ्यांच्या व्हाॅट्सॲप ग्रुपमध्ये होती. त्यानंतरच महिनाभरातच तलाठी जाधव अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग