शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

गणराया बळीराजावरील संकट दूर कर; धनंजय मुंडेंचे बप्पाकडे साकडे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 18:55 IST

वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सव यावर्षी रद्द

परळी (बीड) - कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी वैद्यनाथ येथील पंढरी या निवासस्थानी आज बप्पा विराजमान झाले. ''नैसर्गिक संकटामुळे निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये माझा शेतकरी बळीराजा मात्र संकटात आहे. त्यामुळे हे गणराया तुम्ही सुखकर्ता व दुःखहर्ता होऊन माझ्या शेतकरी बळीराजावरील संकट दूर करा'', असे साकडे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी गणपती बप्पाच्या चरणी घातले.

धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण तर्फे दरवर्षी वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सव आयोजित करण्यात येतो. मात्र, दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवल्याने शेतकरी संकटात आहे, यामुळे मंत्री मुंडे यांनी यावर्षीचा वैद्यनाथ गणेश महोत्सव रद्द केला. मुंडे यांनी सपत्निक विधिवत पूजन करून गणेशाची जगमित्र कार्यालयात स्थापना केली. यावेळी मंत्री मुंडे यांनी उपस्थितांसह राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड,  शिवाजी सिरसाट, रा.कॉ.चे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, रामेश्वर मुंडे, सुनीलनाना फड, सुरेश टाक, माणिकभाऊ फड, माऊली तात्या गडदे, नाथ प्रतिष्ठाण चे सचिव नितीन मामा कुलकर्णी, तुळशीराम पवार, युवक तालुकाध्यक्ष गोविंद कराड, नाथ प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष शंकर कापसे, वैजनाथराव बागवाले, ऍड.मनजीत सुगरे, अमित केंद्रे, संदीप दिवटे यांसह आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवDhananjay Mundeधनंजय मुंडे