शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

राखीव प्रवर्गातील सदस्य अडचणीत

By admin | Published: March 20, 2016 11:35 PM

परभणी :जातवैधता प्रमाणपत्रासंदर्भात ग्रामविकास विभागाने पत्र पाठविल्यानंतर जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांकडून जातवैधता प्रमाणपत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांची माहिती मागविली आहे़

परभणी : ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागांवर विजयी झालेल्या उमेदवारांच्या जातवैधता प्रमाणपत्रासंदर्भात ग्रामविकास विभागाने पत्र पाठविल्यानंतर जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांकडून जातवैधता प्रमाणपत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांची माहिती मागविली आहे़ त्यामुळे अद्यापपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र दाखल न केलेल्या सदस्यांच्या अडचणीत भर पडली आहे़जिल्ह्यात एप्रिल ते जून २०१५ आणि आॅगस्ट ते सप्टेंबर २०१५ या काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक दोन टप्प्यात पार पडली होती़ या निवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले होते़ अनेकांनी जात प्रमाणपत्राची पडतळाणी केली नसल्याने या उमेदवारांना निवडणूक लढविताना जातवैधता प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी अर्ज दाखल केल्याची पावती जोडून निवडणूक लढविण्याची मुभा दिली होती़ मात्र राखीव जागेवर विजयी झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र दाखल करणे बंधनकारक केले होते़ हा कालावधी आता संपला आहे़ त्यामुळे राखीव जागांवरून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे क्रमप्राप्त झाले आहे़ जिल्ह्यातील अनेक विजयी उमेदवारांनी अद्याप असे प्रमाणपत्र दाखल केले नाही़ मध्यंतरी निवडणूक विभागाने राखीव प्रवर्गातील सदस्यांना नोटीस बजावून लेखी म्हणणे मागविले होते़ अनेक सदस्यांनी आपले म्हणणे तहसीलच्या निवडणूक विभागाकडे दाखल केले. मात्र १८ फेब्रुवारी रोजी ग्रामविकास व जलसंधारण विभागाने एक आदेश काढून विहित मुदतीत जात प्रमाणपत्र सादर करण्याचे कळविले आहे़ त्यानुसार राखीव प्रवर्गातून विजयी झालेल्या उमेदवारांनी सहा महिन्यांच्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास कसूर केल्यास त्या व्यक्तीची निवड भुतलक्षी प्रभावाने रद्द झाली असल्याचे मानण्यात येईल आणि ती व्यक्ती सदस्य राहण्यास अपात्र ठरेल, असे कळविले आहे़ त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न करणाऱ्या सदस्य, सरपंचाची नावे गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावीत, असे आदेश महाराष्ट्र शासनाचे उपसचिव गिरीष भालेराव यांनी काढले आहेत़ १८ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या या आदेशामुळे जात वैधता प्रमाणपत्र अद्यापही सादर न केलेल्या सदस्यांच्या अडचणीत भर पडली आहे़ (प्रतिनिधी)दोन वेळा पाठविले स्मरणपत्रपरभणी तहसील कार्यालयाने गटविकास अधिकाऱ्यांना ११ मार्च रोजी पत्र दिले असून, तालुक्यातील ९३ ग्रामपंचायतींमधील राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविलेल्या किती सदस्यांनी जात पडताळणी सादर केली आहे व किती सदस्यांची जात पडताळणी सादर करणे बाकी आहे? याचा अहवाल सात दिवसांत कळवावा, असे सूचित केले आहे़ मात्र सात दिवसांचा कालावधी उलटूनही गटविकास अधिकारी कार्यालयाकडून अद्याप ही माहिती पुरविण्यात आली नसल्याने १६ मार्च रोजी तहसील कार्यालयाकडून गटविकास अधिकाऱ्यांना स्मरणपत्र देण्यात आले आहे़ त्यामुळे किती उमेदवारांनी अद्याप जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही़ परभणी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जात पडतळाणी समितीकडे अर्ज केले आहे़ परंतु, या समितीकडून अद्याप सदस्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही़ अनेक सदस्यांचे जातवैधता प्रकरणे पडताळणी समितीकडेच प्रलंबित असल्याने हे सदस्य अद्यापपर्यंत जातवैधता प्रमाणपत्र दाखल करू शकले नाहीत़ यात सदस्यांचा कुठलाही दोष नसल्याने या सदस्यांना जातवैधता प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी कालावधी वाढवून देण्याची मागणी होत आहे़