शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

पिण्यासाठी पाणी राखीव; यंदा उन्हाळी पिकांसाठी जायकवाडीतून पाणी नाही

By बापू सोळुंके | Published: January 31, 2024 12:40 PM

जायकवाडीमुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यांतील सुमारे १ लाख ८१ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.

छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी प्रकल्पातून यंदा उन्हाळी पिकांसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) प्रशासकांनी घेतला आहे. जायकवाडीत उपलब्ध जलसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती कडाच्या अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार यांनी दिली.

जायकवाडीमुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यांतील सुमारे १ लाख ८१ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. सोबतच जालना, छत्रपती संभाजीनगर या शहरांसह अन्य लगतच्या अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना जायकवाडी प्रकल्पातून आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील विविध औद्योगिक वसाहतींना जायकवाडी प्रकल्पातूनच पाणीपुरवठा होतो. गतवर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे मराठवाड्यासाठी महत्त्वाच्या जायकवाडी प्रकल्पात केवळ ५२ टक्के जलसाठा साचला होता. समन्यायी पाणी वाटप तत्त्वानुसार अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील विविध धरणांतून मराठवाड्याला पाणी मिळावे, यासाठी प्रखर आंदोलन केल्यानंतर ८ टीएमसी पाणी मिळाले होते. यानंतर जायकवाडीतून रब्बी हंगामासाठी दोन आवर्तने सोडण्याचा निर्णय झाला. आता रब्बीचे आवर्तन २६ जानेवारीपासून सुरू झाले आहे. हे आवर्तन २६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील. दरवर्षी उन्हाळी पिकांसाठी जायकवाडी प्रकल्पातून ४ आवर्तने दिली जातात. आता प्रकल्पात केवळ ४० टक्के जलसाठा उरल्याने यंदा उन्हाळी पिकासाठी पाणी न सोडण्याचा निर्णय कडा प्रशासनाने घेतला आहे.

गतवर्षी १ लाख ८१ हजार हेक्टर जमिनीचे सिंचनगतवर्षी वर्षभर चांगला पाऊस झाल्याने जायकवाडीमध्ये मुबलक जलसाठा होता. यामुळे गतवर्षी डाव्या कालव्यातून १ लाख ४१ हजार आणि उजव्या कालव्यातून ४० हजार असे एकूण १ लाख ८१ हजार हेक्टर क्षेत्र गतवर्षी सिंचनाखाली आले होते. आता उपलब्ध जलसाठ्याचा विचार करून संभाव्य पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन यावर्षी जायकवाडीतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येत आहे. उन्हाळी पिकासाठी पाणी सोडले जाणार नाही.- समाधान सब्बीनवार, अधीक्षक अभियंता, कडा कार्यालय

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा