शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला
2
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
3
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
4
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
5
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
6
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
7
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
8
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
9
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
10
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
11
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
12
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
13
कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा
14
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
15
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
16
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
17
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
18
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
19
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
20
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला

अतिक्रमणांना मनपाच जबाबदार

By admin | Published: September 15, 2015 12:06 AM

अशोक कारके , औरंगाबाद महापालिका प्रशासन आणि १३ लाख नागरिक गेल्या काही महिन्यांपासून ‘स्मार्ट औरंगाबाद’चे स्वप्न पाहत आहेत. याच स्वप्नातील औरंगाबादमध्ये

अशोक कारके , औरंगाबादमहापालिका प्रशासन आणि १३ लाख नागरिक गेल्या काही महिन्यांपासून ‘स्मार्ट औरंगाबाद’चे स्वप्न पाहत आहेत. याच स्वप्नातील औरंगाबादमध्ये आजघडीला अनेक समस्या आहेत. त्यातील मुख्य समस्या म्हणजे शहरातील अरुंद आणि खड्डेमय रस्ते. मनपाने याच अरुंद रस्त्यांपैकी जयभवानीनगर, शिवाजी चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रस्त्यांवरील अतिक्रमणांवर नुकतीच कारवाई केली आहे. या कारवाईत अनेकांची घरे भुईसपाट झाली आहेत. या मोहिमेनंतर प्रशासनाने ५० रस्त्यांची मार्किंग केली असून, याच पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने ‘शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण आणि मनपाची कारवाई’ याविषयी सर्वेक्षण केले असता, या सर्वेक्षणात रस्त्यावरील ‘अतिक्रमणाला मनपाच जबाबदार’ असल्याचे मत ७६ टक्के औरंगाबादकरांनी व्यक्त केले आहे.महापालिकेने जयभवानीनगर, शिवाजी चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली आहेत. याचदरम्यान न्यायालयाच्या आदेशाने महसूल विभागाने मकबरा परिसरातील रेणुकामातानगर येथेही कारवाई केली. त्यामध्ये हक्काची घरे असणाऱ्या नागरिकांना बेघर व्हावे लागले. यानंतर मनपाने शहरातील ५० रस्त्यांचे मार्किंग केले. या मार्किंगमध्ये अनेकांची घरे तुटणार हे निश्चित झाल्यामुळे शहरातील वातावरण चांगलेच ढवळले होते. याच पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात ‘अतिक्रमणास जबाबदार असणाऱ्या भूखंड माफियांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी’, असे मत ८० टक्के नागरिकांनी व्यक्त केले, तर मनपाच्या रस्ता रुंदीकरण मोहिमेला ६६ टक्के नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. २४ टक्के नागरिकांनी मोहिमेशी सहमत नसल्याचे म्हटले आहे. १० टक्के नागरिकांनी काही प्रमाणात पाठिंबा असल्याचे सर्वेक्षणात मत व्यक्त केले आहे, तर शहरातील ‘अतिक्रमणाला मनपा प्रशासन जबाबदार आहे’, असे मत ७६ टक्के नागरिकांनी सर्वेक्षणात मांडले आहे, तर १८ टक्के नागरिकांनी मनपा जबाबदार नसल्याचे म्हटले.